AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तानचीच काढली लायकी अन् भारताचं कौतुक करत, म्हणाला…

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्या वादावर बोलताना पाकिस्तानचीच लायकी काढलेली दिसत आहे. तर दुसरीकडे भारताचं कौतुक केलं आहे.

शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तानचीच काढली लायकी अन् भारताचं कौतुक करत, म्हणाला...
| Updated on: Feb 16, 2023 | 5:25 PM
Share

मुंबई : यंदाचा आशिया कप खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितलं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनीही आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानही वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार नसल्याचं सांगितलं होतं. यावरून गेल्या काही दिवसांमागे बराचसा वाद पाहायला मिळाला होता. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने यावर बोलताना पाकिस्तानची लायकी काढलेली दिसत आहे. तर दुसरीकडे भारताचं कौतुक केलं आहे.

नेमकं काय म्हणाला आफ्रिदी?

एखाद्या देशाला आपल्या पायावर उभं राहता येत नसेल तर त्या देशासाठी एखादा निर्णय घेणं सोपं नसतं. भारत जर काही निर्णय घेत असेल तर त्यांनी स्वत:ला तितकं मजबूत केलं आहे. त्यामुळे ते उघडपणे बोलत आहेत. तुम्ही स्वत: ला तितकं बळकट करा मग अशा प्रकारचे निर्णय घ्या. मला माहित नाही की भारत आशिया कप खेळण्यासाठी भारतात येईल की नाही? किंवा पाकिस्तान भारतात जाईल पण यामध्ये आयसीसीने मध्यस्थी करत भूमिका घ्यावी. मात्र आयसीसी बोर्डाचेही बीसीसीआयसमोर काही चालणार नाही, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने या वादावर आपलं मत मांडलं आहे.

भावनिक होऊन मीपण म्हणेल की पाकिस्तान संघाला भारतात जाण्याची गरज नाही. पण हा निर्णय अतिशय विचारपूर्वक करून घ्यायला पाहिजे. अनेक गोष्टी लक्षात घेत तुम्हाला तुमची आर्थिक व्यवस्था पाहावी लागेल. कारण आता तुमची वाईट अवस्था असल्याने तुम्ही भावनिक होऊन निर्णय घेतला नाही पाहिजे, असंही आफ्रिदीने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या एका टीव्ही शोमध्ये आफ्रिदी बोलत होता.

आगामी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान भारतामध्ये गेला नाहीतर जवळपास 30 मिलिअन डॉलरचं नुकसान होणार आहे. इतकंच नाहीतर दक्षिण आफ्रिका संघाला याचा फायदा होणार आहे. आफ्रिकेला क्वालिफायर सामना खेळावा लागणार नाही. आशिया कपचं आयोजन पाकिस्तानच्याऐवजी दुसऱ्या देशात करावं अशी मागणी केली आहे.

दरम्यान, आशिया कपसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येणार नसेल तर वर्ल्ड कपसाठी भारतातही पाकिस्तान संघ जाणार नसल्याचं रमीझ राझा यांनी म्हटलं होतं.  मात्र रमीझ राजा यांना  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे.

Follow Us
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.