AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : बांगलादेशचे सामने भारतात खेळवणार की नाही, BCCI चा निर्णय काय ? मोठी अपडेट समोर

Bangladesh, T20 World Cup 2026 : आधी ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे बांगलादेशच्या संघाचे सामने भारतात, मुंबई आणि कोलकाता येथे होणार होते. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना भारतात पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर हा संघ टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता यावर निर्णय झाला आहे.

T20 World Cup 2026 : बांगलादेशचे सामने भारतात खेळवणार की नाही, BCCI चा निर्णय काय ? मोठी अपडेट समोर
टी 20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशचा संघ खेळमार की नाही ?Image Credit source: PTI
| Updated on: Jan 12, 2026 | 2:56 PM
Share

T20 World Cup 2026, Bangladesh : बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार अत्याचार, त्याचे भारतात उमटलेले पडसाद, बांगलादेशच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये घेण्यास झालेला विरोध, त्यानतंर टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेत त्यांच्या खएळांडूना भारतात येऊन देण्यास बांगलदेश क्रिकेट बोर्डाने (BCB) केलेला विरोध … या सगळ्या घडामोडींनंतर बांगलादेशच्या (Bangladesh)  संघाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. 2026 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशच्या सामन्यांचे ठिकाण बदलू शकते. बीसीसीआयने याबाबत मोठानिर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

मात्र हे ठिकाण श्रीलंकेत असेल की भारतातच कोणत्या दुसऱ्या शहरात या सामन्यांचे आयोजन केले जाईल?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. येत्या 7 फ्बेरुवारी पासून टी-20 वर्ल्डकप 2026 ही स्पर्धा सुरू होणार असून भारत व श्रीलंका या स्पर्धेचे होस्ट आहेत. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार, बांगलादेशचे सर्व गट सामने मूळतः कोलकाता आणि मुंबईत होणार होते.

बांगलादेशच्या मॅचचं ठिकाण बदलणार

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशचे सामने श्रीलंकेत स्थलांतरित होण्याची शक्यता कमी आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, बांगलादेशचे सामने दक्षिण भारतात हलवले जाण्याची शक्यता जास्त आहे. याचा अर्थ असा की हे सामने कोलकाता आणि मुंबईऐवजी चेन्नई आणि तिरुअनंतपुरममध्ये होऊ शकतात.

गेल्या महिन्यात बांगलादेशात हिंदूंच्या हत्येविरोधात झालेल्या निदर्शनांनंतर बीसीसीआयने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून काढून टाकले होते. मात्र यामुळे भडकलेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाने,बीसीसीआयच्या कारवाईला प्रत्युत्तर देत आयसीसीला ईमेल पाठवून 2026 च्या टी20 विश्वचषक सामन्यांचे ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. बांगलादेशने ICCला त्यांचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी भारतात न खेळण्याची इच्छा त्यांच्या ईमेलमध्ये व्यक्त केली.

ताज्या रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या सामन्यांच्या ठिकाणी बदल झाल्याचे दिसून येते. ात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मागणीमुळे हे झाले की नाही हे सांगणे कठीण आहे, कारण हा बीसीसीआयचा निर्णय असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

T20 वर्ल्डकप बांगलादेशचं सध्या शेड्यूल

T20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशचा संघ 7 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू करणार आहे. या शेड्युलनुसार, त्यांचा पहिला सामना कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायचा होता. त्यानंतर, 9 फेब्रुवारी रोजी इटली आणि 14 फेब्रुवारी रोजी इंग्लंडशी त्यांचा सामना होईल. हे दोन्ही सामने कोलकाता येथे होणार आहेत. तर 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत नेपाळविरुद्ध बांगलादेश त्यांचा शेवटचा लीग सामना खेळेल.

'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा.
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा.
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन.