AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC: IND-BAN हा सामना पाण्यात वाहून गेला, तर सेमीफायनलला टीम इंडिया आऊट होणार? असं आहे सोपं समीकरण

रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या काळात टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

T20 WC: IND-BAN हा सामना पाण्यात वाहून गेला, तर सेमीफायनलला टीम इंडिया आऊट होणार? असं आहे सोपं समीकरण
IND-BAN matchImage Credit source: twitter
| Updated on: Nov 02, 2022 | 11:18 AM
Share

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाने (Team India) चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या तीन मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी टीम इंडियाने दोन मॅच जिंकल्या आहेत. आज टीम इंडियाची बांगलादेशविरुद्ध मॅच होणार आहे. पण आजच्या मॅचवरती पावसाचं सावट असल्यामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलमध्ये जाण्याचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या काळात टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आजची मॅच ऑस्ट्रेलियातील एडिलेडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. तिथं ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याकडून आज पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

आजच्या मॅचमध्ये बांगलादेश टीमचा पराभव करणे टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. टीम इंडियाचे तीन सामन्यात 4 गुण आहेत. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचे गुणे देखील टीम इंडिया एव्हढेचं आहेत. गुणतालिकेमध्ये आफ्रिका, इंडिया, बांगलादेश, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि नेदरलँड अशी क्रमवारी आहे.

समजा, आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केला, तर टीम इंडियाकडे 6 गुण होतील. त्याचबरोबर टीम इंडिया एक नंबरला जाईल. त्यानंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेबरोबरची मॅच जिंकावी लागेल. सध्या आफ्रिका टॉपमध्ये आहे. आफ्रिका टीमने पाकिस्तान टीमचा पराभव केला, तर आफ्रिका टीमला सात गुण मिळतील. टीम इंडियाच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तर टीम इंडियाकडे आठ गुण असतील. परंतु उरलेल्या सगळ्या मॅच आफ्रिका टीमने जिंकल्या तर त्याचे गुण 9 असतील.

आजच्या सामन्यात समजा पाऊस आला, टीम इंडिया आणि बांगलादेश टीमला 1-1 गुण मिळेल. त्यानंतर बांगलादेश टीमने समजा पाकिस्तान टीमला मोठ्या फरकाने हरवले तर टीम इंडियाला उत्यांत्य फेरीत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

Follow Us
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.