AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC: IND-BAN हा सामना पाण्यात वाहून गेला, तर सेमीफायनलला टीम इंडिया आऊट होणार? असं आहे सोपं समीकरण

रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या काळात टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

T20 WC: IND-BAN हा सामना पाण्यात वाहून गेला, तर सेमीफायनलला टीम इंडिया आऊट होणार? असं आहे सोपं समीकरण
IND-BAN matchImage Credit source: twitter
| Updated on: Nov 02, 2022 | 11:18 AM
Share

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाने (Team India) चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या तीन मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी टीम इंडियाने दोन मॅच जिंकल्या आहेत. आज टीम इंडियाची बांगलादेशविरुद्ध मॅच होणार आहे. पण आजच्या मॅचवरती पावसाचं सावट असल्यामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलमध्ये जाण्याचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या काळात टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आजची मॅच ऑस्ट्रेलियातील एडिलेडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. तिथं ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याकडून आज पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

आजच्या मॅचमध्ये बांगलादेश टीमचा पराभव करणे टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. टीम इंडियाचे तीन सामन्यात 4 गुण आहेत. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचे गुणे देखील टीम इंडिया एव्हढेचं आहेत. गुणतालिकेमध्ये आफ्रिका, इंडिया, बांगलादेश, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि नेदरलँड अशी क्रमवारी आहे.

समजा, आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केला, तर टीम इंडियाकडे 6 गुण होतील. त्याचबरोबर टीम इंडिया एक नंबरला जाईल. त्यानंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेबरोबरची मॅच जिंकावी लागेल. सध्या आफ्रिका टॉपमध्ये आहे. आफ्रिका टीमने पाकिस्तान टीमचा पराभव केला, तर आफ्रिका टीमला सात गुण मिळतील. टीम इंडियाच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तर टीम इंडियाकडे आठ गुण असतील. परंतु उरलेल्या सगळ्या मॅच आफ्रिका टीमने जिंकल्या तर त्याचे गुण 9 असतील.

आजच्या सामन्यात समजा पाऊस आला, टीम इंडिया आणि बांगलादेश टीमला 1-1 गुण मिळेल. त्यानंतर बांगलादेश टीमने समजा पाकिस्तान टीमला मोठ्या फरकाने हरवले तर टीम इंडियाला उत्यांत्य फेरीत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

Follow Us
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.