AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 पूर्वी टीम इंडियात मोठा बदल, पुन्हा दिसणार नाही…

एशिया कप 2025 मध्ये जेव्हा टीम इंडिया खेळायला उतरेल, तेव्हा 2023 साली जेतेपद जिंकणाऱ्या संघाच्या तुलनेत टीममध्ये काही मोठे बदल दिसून येतील. पूर्वीच्या टीममधील अनेक खेळाडूंची अनुपस्थिती तर जाणवेल पण सगळ्यात मोठा बदल म्हणजे..

Asia Cup 2025 पूर्वी टीम इंडियात मोठा बदल, पुन्हा दिसणार नाही...
टीम इंडियाImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Aug 22, 2025 | 9:56 AM
Share

लवकरच सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे आणि आता सर्वजण जण ही स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये T20 स्वरूपात होणारी ही स्पर्धा सुरू होणार असून यामध्ये 8 संघ सहभागी होत आहेत. यावेलीही सर्वांचं लक्ष भारतीय संघावर असेल, जे यंदाही विजेतेपदासाठी दावेदार आहेत. टीम इंडियाने गेल्यावेळीही आशिया कप जिंकला होता, मात्र त्यावेळची टीम आणि यावेळी स्पर्धेत खेळणारा संघ यामध्ये बराच फरक असेल. आधीच्या संघातील बरेच खेळाडू यावेळी संघात नसल्याने तो फरक तर पडेलच पण त्याचप्रमाणे संघात यावेळी आणखी एक मोठा बदल होणार आहे . तो म्हणजे टीम इंडियाच्या जर्सीमध्ये .. गेल्या वेळी भारतीय संघाच्या जर्सीवर एक गोष्ट लिहीलेली होती, पण ती यावेळी कदाचित दिसणार नाही. ते म्हणजे टायटल स्पॉन्सर ‘ड्रीम 11’.

भारतीय क्रिकेट संघ 10 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यूएईविरुद्ध सामना खेळणार आहे. या काळात, कर्णधार सूर्यकुमार यादवसह सर्व खेळाडूंच्या निळ्या टी20 जर्सीवर भारताचे नाव, बीसीसीआयचा लोगो आणि आशिया कप 2025 चा लोगो असेल, परंतु ड्रीम 11 चा लोगो त्यात नसण्याची शक्यता आहे. हा लोगो भारतीय जर्सीच्या पुढच्या बाजूला, अगदी छातीवर लिहिलेला असतो, कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कंपनीसोबत टायटल स्पॉन्सरशिप करार केला होता.

ऑनलाइन गेमिंग बिलाचा ड्रीम 11 वर परिणाम

खरंतर, ऑनलाइन मनी गेमिंग म्हणजेच पैसे देऊन पैसे कमवणाऱ्या गेम्सवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत एक विधेयक मांडले होते. ‘द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल 2025’ हे केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन दिवसांत मंजूर केले आणि आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर काही दिवसांत ते कायद्याचे रूप घेईल. त्याचा सर्वात मोठा परिणाम भारतात सुरू असलेल्या ऑनलाइन फॅन्टसी गेम्सवर होईल, ज्यामध्ये ड्रीम 11 चा सर्वात जास्त वाटा आहे. क्रिकेटपासून फुटबॉल आणि कबड्डीपर्यंत, ही कंपनी अनेक खेळांमध्ये फँटसी गेम्स चालवते, ज्यामध्ये यूजर्स हे पैसे देऊन भाग घेतात आणि नंतर विजेत्याला त्या बदल्यात पैसे मिळतात. परंतु हे विधेयक कायदा होताच, या खेळांवर बंदी घातली जाईल.

भारतात फॅन्टसी गेम्सच्या वाढत्या व्याप्तीमुळे, ड्रीम 11 सह अनेक कंपन्यांनी त्यात प्रवेश केला होता. आपल्या यशाचा फायदा घेत, ड्रीम 11 ने बीसीसीआय सोबत 358 कोटी रुपयांचा टायटल स्पॉन्सरशिप करार केला, ज्या अंतर्गत भारतीय संघाच्या जर्सीपासून ते प्रशिक्षण किटपर्यंत सर्व गोष्टींवर त्याचे नाव ठळक अक्षरात दिसतं. हा करार 2023 साली झाला होता आणि 2026 पर्यंत चालणार आहे. परंतु या नवीन विधेयकानंतर, ड्रीम 11 ला त्याचा फॅन्टसी गेमिंग व्यवसाय बंद करावा लागेल, तो त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे.

टीम इंडियाला स्पॉन्सर नाही ?

असं झाल्यास ड्रीम 11 या स्पॉन्सरशीप डीलच्या शेवटच्या वर्षाच्या आधी माघार घेऊ शकते अशी भीती आहे. जर असं झाले आणि कंपनीने आशिया कपपूर्वी भारतीय बोर्डासोबतचा करार संपवण्यास सहमती दर्शवली, तसेच या काळात बीसीसीआयने कोणत्याही नवीन कंपनीसोबत करार केला नाही, तर आशिया कप दरम्यान भारतीय संघाच्या जर्सीवर कोणत्याही कंपनीचा लोगो दिसणार नाही. असं झाल्यास BCCI लास कोट्यवधींचं नुकसान होऊ शकतं. सध्याच्या कराराअंतर्गत, बीसीसीआयला द्विपक्षीय (आणि आशिया कप) आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ड्रीम11 कडून ६ कोटी रुपये मिळतात, तर आयसीसी स्पर्धांसाठी ही रक्कम 2 कोटी रुपये आहे, कारण त्यामध्ये स्पॉन्सरचं नाव थेट छातीवर नसून हातावर लिहीलेलं असतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.