Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची लॉटरी, निवड समितीचं बिग सरप्राईज…, होणार कॅप्टन
मोठी बातमी समोर येत आहे, वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत जो काही खेळ केला आहे, त्यामुळे भारताचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष त्याने आपल्याकडे वेधून घेतलं आहे. याचचं मोठं बक्षिस आता त्याला मिळणार असून, निवड समितीने मोठा निर्णय घेतला आहे.

सध्या क्रिकेटमध्ये एक नाव चांगलंच गाजत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. अवघं 15 वर्ष वय असलेल्या या खेळाडूने भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या बॅटच्या जोरावर पाणी पाजलं आहे. समोर कोणताही बॉलर असो आक्रमकता हे आतापर्यंत वैभव सूर्यवंशीच्या खेळीचं वैशिष्ट राहिलं आहे, तो बॉलरवर तुटून पडतो, त्याच्या खेळीमध्ये सिक्सर आणि चौकारांचा पाऊस पडतो. वैभवने आयपीएमध्ये जो काही खेळ केला, त्यामुळे संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये देखील जागा मिळाली, टीम इंडियाकडून खेळताना देखील त्याने काही सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. येणाऱ्या काळात क्रिकेटच भविष्य म्हणून वैभव सूर्यवंशीकडे पाहिलं जातं आहे.
दरम्यान वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी नियुक्ती झाल्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. पूर्व विभागाच्या निवड समितीने दुलीप ट्रॉफीसाठी त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला उपकर्णधार बनवलं आहे. दुलीप ट्रॉफीसाठी इशान किशन हा कर्णधार असणार आहे, तर वैभव सूर्यवंशीवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वैभवने आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन केलं म्हणून किंवा त्याची टीम इंडियात निवड झाली म्हणून त्याची दुलीप ट्रॉफीसाठी उपकर्णधारपदी निवड झालेली नाहीये तर सिलेक्टर आता त्याच्याकडे पूर्ण नेतृत्व सोपवण्याच्या तयारीत आहेत, त्याला कर्णधार बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळेच यावेळी इशान किशन याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीमचा त्याला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. वैभवने मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी कर्णधार पदाच्या जबाबदारीमधील बारकावे शिकावेत अशी निवडकर्त्यांची अपेक्षा आहे.
दरम्यान पूर्व विभाग निवड समितीने दुलीप ट्रॉफीसाठी जो संघ निवडला आहे, त्यामध्ये अभिमन्यु ईश्वरन, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार सारखे अनेक अनुभव खेळाडू असताना देखील वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, समोर आलेल्या माहितीप्रमाणे भविष्यात त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे, त्यासाठी त्याला यावेळी उपकर्णधार बनवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच वैभव सूर्यवंशीची आता कर्णधारपदी निवड होऊ शकते.
