विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली कायम फ्लॉप

विश्वचषकात 5 धावांवर 3 विकेट गमावणारा भारत पहिलाच संघ ठरलाय. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. विशेष म्हणजे विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात लवकर बाद होण्याची परंपरा कर्णधार विराट कोहलीने यावेळीही कायम ठेवली.

विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली कायम फ्लॉप
नप
Follow us
| Updated on: Jul 10, 2019 | 5:54 PM

लंडन : ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर न्यूझीलंडने सुरुवातीलाच भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलंय. सुरुवातीच्या 5 धावांमध्ये महत्त्वाचे फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल प्रत्येकी 1-1-1 धावा करुन बाद झाले. यासोबतच विश्वचषकात भारतीय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंद झालाय. विश्वचषकात 5 धावांवर 3 विकेट गमावणारा भारत पहिलाच संघ ठरलाय. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. विशेष म्हणजे विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात लवकर बाद होण्याची परंपरा कर्णधार विराट कोहलीने यावेळीही कायम ठेवली.

विराट कोहली 2015 च्या विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये एक धाव करुन बाद झाला होता. त्याअगोदर 2011 च्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीला 9 धावा करता आल्या होत्या. तेव्हा तो वाहब रियाजच्या गोलंदाजीवर उमर अकमलकडे झेल देऊन बाद झाला होता.

विश्वचषक सेमीफायनलमध्ये विराट कोहलीची कामगिरी

9(21) वि. पाकिस्तान (2011 विश्वचषक)

1(13) वि. ऑस्ट्रेलिया (2015 विश्वचषक)

1(6) वि. न्यूझीलंड (2019 विश्वचषक)

विश्वचषकातील नॉकआऊट सामन्यात विराटची कामगिरी

24(33) – वि. ऑस्ट्रेलिया (क्वार्टर फायनल, 2011 विश्वचषक)

9(21) – वि. पाकिस्तान (सेमीफायनल, 2011 विश्वचषक)

35(49)- वि. श्रीलंका (फायनल, 2011 विश्वचषक)

3(8) – वि. बांगलादेश (क्वार्टर फायनल, 2015 विश्वचषक)

1(13) – वि. ऑस्ट्रेलिया (सेमीफायनल, 2015 विश्वचषक)

1(6) – वि. न्यूझीलंड (सेमीफायनल, 2019 विश्वचषक)

जगातील नंबर वन फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा विश्वचषकाच्या नॉकाऊट सामन्यातला विक्रम भारतीय संघाची चिंता वाढवणारा आहे. नॉकआऊट सामन्यात 12.16 च्या सरासरीने त्याने केवळ 73 धावा केल्या आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.