AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : रोहित शर्माने टीम इंडियाचे T20 चे कर्णधारपद सोडावे का ? ही आहेत सर्वात मोठी कारणे

रोहित शर्माचं वय वाढत चालल्यामुळे त्याच्यावर अनेकजण टीका करीत आहे.

T20 World Cup 2022 : रोहित शर्माने टीम इंडियाचे T20 चे कर्णधारपद सोडावे का ? ही आहेत सर्वात मोठी कारणे
Rohit sharma Image Credit source: icc twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 18, 2022 | 3:04 PM
Share

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनच्या सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियातील (Team India) खेळाडूंवर चाहत्यांनी सडकून टीका केली होती. विशेष म्हणजे काही क्रिकेटच्या चाहत्यांनी बीसीसीआयला (BCCI) खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तात्काळ बाहेर काढून टाका अशी मागणी केली होती. आजपासून टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध T20 मालिका सुरु झाली आहे. हार्दीक पांड्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

रोहित शर्मा आता 35 वर्षाचा झाला आहे. तो तीन-चार महिने झाले की, क्रिकेटमधून विश्रांती घेत असतो. त्याच्याकडे टीम इंडियाचं तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपद आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सुद्धा आहे. एकाचवेळी इतक्या ठिकाणचं कर्णधारपद सांभाळाणं सोप्प नाही. त्यामुळे टीम इंडियाचं T20 फॉरमॅटमधील कर्णधार पद हार्दीक पांड्याला द्यायला हवं.

रोहित शर्माचं वय वाढत चालल्यामुळे त्याच्यावर अनेकजण टीका करीत आहे. कारण त्याचा फॉर्म आता पुर्वीसारखा राहिलेला नाही. मागच्या 12 टी 20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये फक्त एकदाच 50 धावाचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा सारख्या खेळाडूला अशा पद्धतीचे आकडे शोधत नाहीत. झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने फक्त 116 केल्या. त्यामुळे त्याच्या फॉर्मविषयी अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.

हार्दीक पांड्या सध्या चांगली खेळी करीत आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत सुद्धा चांगली खेळी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल मॅचमध्ये हार्दीक पांड्याने अंतिम ओव्हरमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 2024 मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हार्दीक पांड्याला कर्णधारपद द्यायचा बीसीसीआयचा विचार सुरु आहे. विशेष म्हणजे मागच्या आयपीएलच्या सीजनमध्ये हार्दीक पांड्याने गुजरात टाइटंसला चषक जिंकून दिला आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!