AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिजिटल पेमेंट आता अधिक सुरक्षित, ऑनलाईन व्यवहारांना एटीएम पिन नाही

डिजिटल पेमेंट सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑनलाईन पेमेंटमध्ये महत्त्वाचा (digital payment rules change) बदल केला आहे.

डिजिटल पेमेंट आता अधिक सुरक्षित, ऑनलाईन व्यवहारांना एटीएम पिन नाही
UPI मनी ट्रान्सफर आणि PhonePe वर ऑफलाईन-ऑनलाईन पेमेंटची सुविधा मिळणार मोफत
| Edited By: | Updated on: Mar 20, 2020 | 10:03 AM
Share

मुंबई : डिजिटल पेमेंट सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑनलाईन पेमेंटमध्ये महत्त्वाचा (digital payment rules change) बदल केला आहे. यापुढे आता ऑनलाईन पेमेंट करताना एटीएम पिनची गरज लागणार नाही. एटीएम पिन ऐवजी आता ओटीपी पासवर्डची सुविधा दिली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने ऑनलाईन पेमेंट आणि अॅग्रिगेटर्स कंपन्यांना याबाबतच्या सूचना (digital payment rules change) दिल्या आहेत.

यापुढे आता दोन हजार रुपयांच्या ऑनलाईन पेमेंटसाठी एटीएम पिनची गरज लागणार नाही. त्या ऐवजी तुम्हाला ओटीपी पासवर्डची गरज लागेल. एटीएम पिनद्वारे फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आरबीआयकडून हा निर्णय घेण्यात आला. लवकरच ओटीपी पासवर्डची सुविधा सुरु केली जात आहे. ओटीपी थेट युझर्सच्या मोबाईलवर येणार त्यामुळे इतर कोणी तुमच्यासोबत फसवणूक करण्याची शक्यता कमी आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांना आरबीआयच्या सूचना

आरबीआयने ई-कॉमर्स कंपन्यांनाही ऑनलाईन पेमेंट संबंधित सूचना दिल्या आहेत. ऑर्डर कॅन्सल किंवा इतर काही गोष्टीत रिफंड मिळणार असेल तर ते पैसे ग्राहकाने पेमेंट केलेल्या बँक खात्यात किंवा क्रेडिट कार्डमध्ये जमा झाले पाहिजे. बऱ्याचदा अनेक कंपन्या रिफंड बँक खात्यात न देता थेट ई-वॉलेटमध्ये ट्रान्सफर करतात.

पेमेंट अॅग्रिगेटर्सला नोडेल अधिकारी नियुक्ती करावे लागणार

आरबीआयच्या सूचनेनुसार पेमेंट अॅग्रिगेटर्स कंपनी ग्राहकांचे एटीएम पिन मागू शकत नाहीत. याशिवाय पेमेंट अॅग्रिगेटर्सला ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल, असे आदेश आरबीआयने दिले आहेत. याशिवाय मोबाईल अॅपवरही तक्रार करण्याची सुविधा असावी.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.