हजारो कोटींचा तोटा सहन करत असलेली BSNL कंपनी बंद होणार?

नवी दिल्ली : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेली सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल बंद करण्याबाबत विचार करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिल्याचं बोललं जातंय. शिवाय या कंपनीची निर्गुंतवणूक करण्याचाही पर्याय केंद्र सरकारने दिला आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये बीएसएनएलचा आर्थिक तोटा 31 हजार 287 कोटी रुपयांवर पोहोचलाय. यानंतर केंद्र सरकारच्या वरिष्ठ […]

हजारो कोटींचा तोटा सहन करत असलेली BSNL कंपनी बंद होणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

नवी दिल्ली : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेली सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल बंद करण्याबाबत विचार करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिल्याचं बोललं जातंय. शिवाय या कंपनीची निर्गुंतवणूक करण्याचाही पर्याय केंद्र सरकारने दिला आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये बीएसएनएलचा आर्थिक तोटा 31 हजार 287 कोटी रुपयांवर पोहोचलाय. यानंतर केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर हा पर्याय समोर आल्याचं बोललं जातंय.

बैठकीत बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी दूरसंचार सचिवांसमोर एक प्रझेंटेशन केलं. ज्यामध्ये कंपनीची आर्थिक परिस्थिती, एकूण तोटा, रिलायन्स जिओ आल्यानंतर व्यवसायावर झालेला परिणाम, कर्मचाऱ्यांसाठी संभावित वॉलंटरी रिटायरमेंट स्कीम (व्हीआरएस) आणि वेळेपूर्वी सेवानिवृत्ती योजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रतिस्पर्धी कंपन्या बीएसएनएलसाठी अडचण तर आहेतच, शिवाय कर्मचाऱ्यांचं काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण, कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी व्हीआरएस किंवा सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षांहून 58 वर्षांवर येणार असल्याचंही बोललं जातंय. 2019-20 पासून सेवानिवृत्तीचं वय कमी केल्यास कंपनीला कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी जो खर्च येतो, त्यामध्ये तीन हजार कोटींची बचत होईल.

व्हीआरएससाठी कंपनीकडून 56-60 या वयोगटातील कर्मचाऱ्यांचा विचार केला जाणार आहे. या गटात जवळपास 67 हजार कर्मचारी आहेत. कंपनीच्या मते, यापैकी निम्म्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च वाचला तरीही तीन हजार कोटी रुपयांची बचत होईल.

बीएसएनएलकडे ज्या जागा आणि इमारती आहेत, त्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याचाही विचार केला जातोय. ही सर्व संपत्ती 15 हजार कोटी रुपयांची आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....