AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन पाण्यात पडला तर तांदळात ठेवण खरंच योग्य आहे का? एकदा नक्की वाचा!

स्मार्टफोन पाण्यात पडला, की बहुतेक लोक तांदळात ठेवतात. पण हा उपाय खरंच काम करतो का? तांदूळ फोनचं पाणी शोषतो की नुकसान वाढवतो? हे कारण ऐकल्याने तुमचं मत कदाचित बदलेल! त्यामुळे तांदुळ नाही तर मग पुढच्या वेळी फोन पाण्यात पडला तर काय करायचं हे जाणून घ्या

फोन पाण्यात पडला तर तांदळात ठेवण खरंच योग्य आहे का? एकदा नक्की वाचा!
| Edited By: | Updated on: Apr 22, 2025 | 2:30 PM
Share

आजकाल फोन आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण जर तो चुकून पाण्यात पडला, तर मोठी अडचण होऊ शकते. पाण्यामुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते, फोन बंद पडू शकतो किंवा कायमचं नादुरुस्त होऊ शकतो. अशा वेळी घाबरून न जाता तातडीने योग्य पावलं उचलली, तर तुमचा फोन वाचू शकतो.

बरेच लोक पाण्यात पडलेला फोन तांदळात ठेवतात, पण हा उपाय खरंच फायदेशीर आहे का? आणि फोन पाण्यात गेला, तर नेमकं काय करायचं? चला, याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया.

तांदूळ खरंच फायदेशीर आहे का?

तांदूळ हवेतील ओलावा शोषतो, हे खरं असलं तरी पाण्यात पडलेला फोन वाचवण्यासाठी हा उपाय पुरेसा नाही. उलट, तांदळाचे लहान कण फोनच्या चार्जिंग पोर्ट, स्पीकर किंवा जॅकमध्ये अडकून समस्या वाढवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, हा उपाय काहीसा जुना आणि आता कमी प्रभावी मानला जातो.

फोन पाण्यात पडल्यावर काय करायला हवं?

१. लगेच फोन बंद करा : फोन पाण्यातून बाहेर काढताच तो चालू असेल, तर लगेच बंद करा. चालू फोनमुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो.

२. सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसा : फोनच्या बाहेर आणि पोर्ट्सजवळील पाणी हलक्या हाताने सुक्या कपड्याने पुसा.

३. कव्हर, सिम, मेमरी कार्ड काढा : पाण्याचा अडथळा होणारी सर्व उपकरणं काढून टाका.

४. नैसर्गिकरित्या वाळू द्या किंवा ड्रायरचा वापर करा : फोन कोरड्या व हवेशीर जागेत ठेवा, किंवा गरज भासल्यास हलक्याश्या हवेच्या ड्रायरने सुखवा.

भारतात अंदाजे 70 कोटींहून अधिक फोन वापरकर्ते आहेत, आणि त्यापैकी बरेच जण फोन पाण्यात पडण्याच्या समस्येला सामोरं जातात. विशेषतः पावसाळ्यात किंवा समुद्रकिनारी फिरताना अशा घटना वारंवार घडतात. पण बऱ्याचदा चुकीच्या उपायांमुळे फोनचं नुकसान टाळण्याऐवजी ते वाढतं. उदाहरणार्थ, तांदूळ हा उपाय वर्षानुवर्षे वापरला जातो, पण आधुनिक फोन्सच्या जटिल रचनेमुळे तो प्रभावी ठरत नाही.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....