AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन पाण्यात पडला तर तांदळात ठेवण खरंच योग्य आहे का? एकदा नक्की वाचा!

स्मार्टफोन पाण्यात पडला, की बहुतेक लोक तांदळात ठेवतात. पण हा उपाय खरंच काम करतो का? तांदूळ फोनचं पाणी शोषतो की नुकसान वाढवतो? हे कारण ऐकल्याने तुमचं मत कदाचित बदलेल! त्यामुळे तांदुळ नाही तर मग पुढच्या वेळी फोन पाण्यात पडला तर काय करायचं हे जाणून घ्या

फोन पाण्यात पडला तर तांदळात ठेवण खरंच योग्य आहे का? एकदा नक्की वाचा!
| Edited By: | Updated on: Apr 22, 2025 | 2:30 PM
Share

आजकाल फोन आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण जर तो चुकून पाण्यात पडला, तर मोठी अडचण होऊ शकते. पाण्यामुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते, फोन बंद पडू शकतो किंवा कायमचं नादुरुस्त होऊ शकतो. अशा वेळी घाबरून न जाता तातडीने योग्य पावलं उचलली, तर तुमचा फोन वाचू शकतो.

बरेच लोक पाण्यात पडलेला फोन तांदळात ठेवतात, पण हा उपाय खरंच फायदेशीर आहे का? आणि फोन पाण्यात गेला, तर नेमकं काय करायचं? चला, याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया.

तांदूळ खरंच फायदेशीर आहे का?

तांदूळ हवेतील ओलावा शोषतो, हे खरं असलं तरी पाण्यात पडलेला फोन वाचवण्यासाठी हा उपाय पुरेसा नाही. उलट, तांदळाचे लहान कण फोनच्या चार्जिंग पोर्ट, स्पीकर किंवा जॅकमध्ये अडकून समस्या वाढवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, हा उपाय काहीसा जुना आणि आता कमी प्रभावी मानला जातो.

फोन पाण्यात पडल्यावर काय करायला हवं?

१. लगेच फोन बंद करा : फोन पाण्यातून बाहेर काढताच तो चालू असेल, तर लगेच बंद करा. चालू फोनमुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो.

२. सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसा : फोनच्या बाहेर आणि पोर्ट्सजवळील पाणी हलक्या हाताने सुक्या कपड्याने पुसा.

३. कव्हर, सिम, मेमरी कार्ड काढा : पाण्याचा अडथळा होणारी सर्व उपकरणं काढून टाका.

४. नैसर्गिकरित्या वाळू द्या किंवा ड्रायरचा वापर करा : फोन कोरड्या व हवेशीर जागेत ठेवा, किंवा गरज भासल्यास हलक्याश्या हवेच्या ड्रायरने सुखवा.

भारतात अंदाजे 70 कोटींहून अधिक फोन वापरकर्ते आहेत, आणि त्यापैकी बरेच जण फोन पाण्यात पडण्याच्या समस्येला सामोरं जातात. विशेषतः पावसाळ्यात किंवा समुद्रकिनारी फिरताना अशा घटना वारंवार घडतात. पण बऱ्याचदा चुकीच्या उपायांमुळे फोनचं नुकसान टाळण्याऐवजी ते वाढतं. उदाहरणार्थ, तांदूळ हा उपाय वर्षानुवर्षे वापरला जातो, पण आधुनिक फोन्सच्या जटिल रचनेमुळे तो प्रभावी ठरत नाही.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.