AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mobile Game : भारत सरकारनं लाँच केला मोबाईल गेम, गेममध्ये काय विशेष, काय नवं? जाणून घ्या…

Mobile Game :  झिंगा इंडियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या मोबाईल गेममध्ये स्वातंत्र्याचा संघर्ष सांगण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या खेळाची ओळख झाली आहे. अधिक जाणून घ्या...

Mobile Game : भारत सरकारनं लाँच केला मोबाईल गेम, गेममध्ये काय विशेष, काय नवं? जाणून घ्या...
भारत सरकारनं लाँच केला मोबाईल गेम,Image Credit source: social
| Updated on: Aug 25, 2022 | 10:42 AM
Share

नवी दिल्ली : दिवसागणिक ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मोठे असो वा लहान अगदी सर्वांनाच मोबाईल गेमची आवड असते. वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल गेमविषयी अनेकदा बोललं जातं. तसाच एक गेम आता भारत सरकारच्या सहकार्यानं बनवण्यात आला आहे. याविषयी जाणून घेऊया. भारत सरकारच्या (Government of India) मंत्रालयाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या मोबाईल (Mobile Game) गेममध्ये झिंगाने स्वातंत्र्याचा संघर्ष सांगितला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या खेळाची ओळख झाली आहे. स्वातंत्र्याच्या वीरांची आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी या खेळाच्या अगदी सुरुवातीला दाखवली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर (Anurag Thakur) यांच्या उपस्थितीत हा मोबाईल गेम सादर करण्यात आला आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएससाठी रिलीज करण्यात आले आहे . हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी दोन्ही सपोर्ट करते. हे सप्टेंबर 2022 पासून जागतिक स्तरावर उपलब्ध होईल.

दोन्ही मोबाईल गेम्सना आझादी क्वेस्ट आणि हिरोज ऑफ भारत मोबाईल गेम असे नाव देण्यात आले आहे आणि झिंगा इंडियाने प्रकाशन विभाग आणि इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च (ICHR) यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. मोबाईल अ‍ॅप लाँच करताना मंत्री ठाकूर म्हणाले की, हा गेम ऑनलाइन गेमच्या मोठ्या बाजारपेठेचा वापर करण्याच्या आणि या गेमच्या मदतीने त्यांना शिक्षित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. भारत सरकारच्या विविध युनिट्स देशाच्या प्रत्येक भागातून निनावी स्वातंत्र्यसैनिकांची माहिती गोळा करत आहेत.

गेमर्सची संख्या 45 कोटींवर पोहोचेल

2021 मध्ये ऑनलाइन गेमिंग क्षेत्र 28 टक्के दराने वाढले आहे आणि 2023 मध्ये ऑनलाइन गेमर्सची संख्या 450 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

गेममधील स्वातंत्र्याची कहाणी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की, या ऑनलाइन गेम विकसित करण्याची कल्पना ठाकूर आणि झिंगा इंडियाचे प्रतिनिधी यांच्यात या वर्षी दुबई एक्स्पोच्या वेळी झालेल्या बैठकीदरम्यान आली. आझादी क्वेस्ट मालिकेतील पहिले दोन गेम भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी सांगतात आणि महत्त्वाचे टप्पे आणि नायकांची माहिती मजेशीर पद्धतीने देतात. हिरोज ऑफ इंडिया हे भारतीय स्वातंत्र्याशी संबंधित ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी क्विझ गेम म्हणून डिझाइन केले आहे. स्वातंत्र्याच्या वीरांची आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी या खेळाच्या अगदी सुरुवातीला दाखवली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत हा मोबाईल गेम सादर करण्यात आला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.