AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनोळखी रस्ते आता स्वत:च शोधा, GPS बंद होण्याच्या मार्गावर

मुंबई : ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच GPS शिवाय आज आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करु शकत नाही. रेल्वेची माहिती असो किंवा गुगल मॅपचा वापर, GPS आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. जर हेच GPS सिस्टीम बंद पडलं तर, आपण याचा विचारही करु शकत नाही. पण, येत्या 6 एप्रिलपासून GPS बंद होऊ शकतं. असं होऊ नये यासाठी संपूर्ण […]

अनोळखी रस्ते आता स्वत:च शोधा, GPS बंद होण्याच्या मार्गावर
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

मुंबई : ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच GPS शिवाय आज आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करु शकत नाही. रेल्वेची माहिती असो किंवा गुगल मॅपचा वापर, GPS आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. जर हेच GPS सिस्टीम बंद पडलं तर, आपण याचा विचारही करु शकत नाही. पण, येत्या 6 एप्रिलपासून GPS बंद होऊ शकतं. असं होऊ नये यासाठी संपूर्ण जगातील टेक्नोलॉजी एक्सपर्ट आणि नेटवर्क ऑपरेटर्स या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

ईएएसए सेफ्टी इन्फॉरमेशन बुलेटीननुसार, 6 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून GPS रिसीव्हरवर नॅव्हिगेशन डेटा चुकिचा येईल. यासाठी GPS च्या वीक नंबर (आठवड्याचा क्रमांक) रोलओव्हर इव्हेंटला रिसेट करावं लागतं. जर 6 एप्रिलपर्यंत GPS डेटा रिसीव्हरला रिसेट केलं गेलं नाही, तर नॅव्हिगेशन सोल्यूशसाठी ज्या टाईम डेटाचा वापर केला जातो, तो बदलून जाईल. GPS च्या वेळेत एका नॅनो सेकंदाचा बदलही GPS डेटामध्ये एक फुटाच्या बरोबरीचा होऊ शकतो, असे ईएएसएने सांगितलं.

GPS च्या वीकली नंबरची मर्यादा ही शून्य ते 1023 आठवड्यांची आहे. जी मर्यादा आधीच पार झाली आहे. 6 एप्रिल 2019 पासून याचा 2014 वा आठवडा सुरु होणार आहे. त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. 6 एप्रिलपासून GPS सिस्टीमचा पहिला आठवडा सुरु होईल. म्हणजेच जेव्हा GPS मध्ये पहिल्यांदा वेळ आणि काळ टाकण्यात आला असेल, तेव्हापासून पुन्हा ते चक्र सुरु होईल. 6 एप्रिल 2019 ला GPS 21 ऑगस्ट 1999 समजेल आणि त्यानुसार काम करेल. 21 ऑगस्ट 1999 लाच GPS रोलओव्हर करण्यात आलं होतं. GPS मध्ये ही समस्या 21 ऑगस्ट 1999 लाही उद्भवली होती. तेव्हा GPS चा इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर होत नव्हता. पण, जर ही समस्या आज उद्भवली तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. कारण, आज उद्योग-धंद्यांमध्ये, सरकार आणि सामान्य लोकही मोठ्या प्रमाणावर GPS चा वापर करतात.

जगभरातील जानकार आणि टेक्नोलॉजी एक्सपर्ट या समस्येवर उपाय शोधत आहेत. ही समस्या खूप मोठी आहे, यामुळे संपूर्ण जगातील GPS सिस्टमवर याचा परिणाम होईल. कारण, आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन आहेत. ज्यावर आपण रस्ता शोधण्यासाठी, आपलं लोकेशन शेअर करण्यासाठी, टॅक्सी बुक करण्यासाठी इत्यादी कामांसाठी GPS चा वापर करतो. तसेच GPS मुळे गुन्हेगारीवर रोख लावण्यातही बरीच मदत होते. त्यासोबतच वेगवेळ्या उद्योगांतही GPS चा वापर केला जातो. त्यामुळे जर GPS सेवा ठप्प झाली किंवा त्यात काही बिघाड आला तर जगभरातील लोकांना याचा त्रास होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.