AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोनमध्ये पाणी गेल्यावर घाबरू नका, ‘या’ टिप्स येतील नक्कीच कामी

चुकून तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाणी शिरले किंवा फोन पाण्यात पडला तर तुम्ही काय कराल? कारण स्मार्टफोनची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या फोनमध्ये पाणी गेल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स वापरू शकता.

फोनमध्ये पाणी गेल्यावर घाबरू नका, 'या' टिप्स येतील नक्कीच कामी
holi colour mobile 1
| Edited By: | Updated on: Mar 14, 2025 | 2:06 PM
Share

मोबाईल ही आता प्रत्येकाची गरज झाली आहे. त्यामुळे अगदी विद्यार्थ्यांपासून ते घरातल्या प्रत्येक मंडळींपर्यंत आपापला खाजगी फोन असतोच. मोबाईल कुठे पडणार नाही, याची आपण पुरेशी काळजी घेतोच. पण कधीतरी चुकून मोबाईल नेमका पाण्यातच पडतो. अशावेळी नेमकं काय करावं हे अनेकांना समजत नाही. बऱ्याचदा घाई गडबडीत आपण केलेल्या एका चुकीमुळे फोन खराब होतो. त्यात अनेकांना असे वाटते की फोनमध्ये पाणी गेल्यावर तो लगेच खराब होतो, पण असे अजिबात नाही. समजा चुकून तुमचा फोन पाण्यात पडला तर या काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही पुन्हा आहे त्या स्थितीत चालू करू शकता. यासाठी तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाही. चला जाणून घेऊयात या सोप्या ट्रिक्स…

फोनमध्ये पाणी गेल्यावर काय करावे?

होळी खेळताना जर तुमच्या फोनमध्ये पाणी शिरले तर घाबरून जाण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही फक्त या काही गोष्टी करायला हव्यात.

तुमचा स्मार्टफोन बंद करा : तुमचा फोनमध्ये पाणी शिरल्यास तुम्ही तो ताबडतोब बंद करण्याचा प्रयत्न करा. तसेच मोबाईल जर पाण्यात पडला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थोडा वेळ तो सुरू करण्याचा अजिबात प्रयत्न करून नका. तसेच तो चार्जिंगलाही लावू नका. यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.

सिम कार्ड आणि मेमरी कार्ड : फोन बंद केल्यानंतर, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून टाका. यामुळे, फोनमध्ये पाणी शिरले तरी सिम कार्ड आणि मेमरी कार्डचे नुकसान होत नाही.

फोन सुकवा : फोन मोकळ्या हवेत ठेवा. अशी जागा निवडा जिथे अजिबात ओलावा नाही. तसेच तुम्ही पंखा चालवू ठेवून फोन सुकवू शकता.

तांदळात ठेवा : जर तुमच्या फोनमध्ये पाणी शिरले असेल तर तुम्ही तो फोन काही तासांसाठी तांदळाच्या पिशवीत किंवा तांदळ्याच्या डब्ब्यात ठेवू शकता. कारण तांदूळ ओलावा लवकर शोषून घेतो.

सर्विस सेंटर : वर नमूद केलेल्या पद्धती वापरूनही जर तुमचा फोन काम करत नसेल, तर तुमचा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत सर्विस सेंटरेमध्ये घेऊन जा. सर्विस सेंटर तुमचा फोन अधिक चांगल्या प्रकारे तपासू ठिक करून देऊ शकतात.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.