AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात तब्बल 4 कोटी फोनची विक्री, नंबर वन पटकावत Xiaomi चा दबदबा, टॉप 5 कंपन्या कोणत्या?

शाओमी हा ब्रँड स्मार्टफोनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. (Indian Smartphone Market top 5 selling Phones)

वर्षभरात तब्बल 4 कोटी फोनची विक्री, नंबर वन पटकावत Xiaomi चा दबदबा, टॉप 5 कंपन्या कोणत्या?
Xiaomi स्मार्टफोन
| Updated on: Feb 16, 2021 | 11:34 PM
Share

मुंबई : कोरोना काळात स्मार्टफोनच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. मात्र शाओमी (Xiaomi) या स्मार्टफोन कंपनीचा मार्केटमध्ये अद्याप दबदबा कायम आहे. शाओमी या कंपनीने गेल्या वर्षभरात भारतात 4.1 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. गेल्या वर्षी भारतीय बाजारात शाओमीची भागीदारी ही 27 टक्के इतकी होती. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या भागीदारीत 6 टक्क्यांनी घट झाली आहे. पण तरीही शाओमी या ब्रँडला भारतीय स्मार्टफोनला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे शाओमी हा ब्रँड स्मार्टफोनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, IDC च्या एका अहवालात याबाबतची माहिती समोर आली आहे. (Indian Smartphone Market top 5 selling Phones)

गेल्यावर्षी कोरोना काळात सर्वच व्यापारी, तसेच मोठमोठ्या कंपन्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोना काळात मंदी असतानाही गेल्यावर्षी भारतात 15 कोटीहून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली आहे. शाओमीच्या या जबरदस्त यशामागे रेडमी 8 आणि रेडमी 9 या दोन स्मार्टफोन सीरिजचा फार मोठा सहभाग आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सीरिजनंतर आता Redmi Note 10 सीरिज बाजारात आणणार आहे.

सॅमसंगकडून 2.97 कोटी स्मार्टफोनची विक्री 

तर दुसरीकडे IDC च्या अहवालानुसार, दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग हा स्मार्टफोन ब्रँड आहे. 2019 च्या तुलनेत यंदा सॅमसंगच्या विक्रीत 4 टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान गेल्यावर्षी सॅमसंगने 2.97 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. त्यामुळे सॅमसंगने 20 टक्के भागीदारी मिळवली आहे.

सॅमसंगच्या Galaxy M आणि Galaxy F सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2019 च्या तुलनेत सॅमसंगच्या स्मार्टफोनची ऑनलाईन सेल 65 टक्क्यांनी वाढली आहे.

वीवोकडून 2.67 कोटी स्मार्टफोनची विक्री 

तर या अहवालात चायनीज कंपनी वीवो (Vivo) ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी वीवो कंपनीची स्मार्टफोनच्या विक्रीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 2020 मध्ये वीवोने एकूण 2.67 कोटी स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. वीवोची बाजारात 18 टक्के भागीदारी आहे.

तसेच गेल्यावर्षी भारतीय स्मार्टफोन बाजारात रिअलमी (Realme) चौथ्या क्रमांकावर आहे. रिअलमीने गेल्यावर्षी 1.92 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. रिअलमीचा बाजारातील हिस्सा 13 टक्के आहे. त्याचबरोबर ओप्पो (Oppo) पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षात ओप्पोने 1.65 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. गेल्यावर्षी भारतीय बाजारात ओप्पोचा बाजारात हिस्सा 11 टक्के इतका होता. (Indian Smartphone Market top 5  selling Phones)

संबंधित बातम्या : 

6.5 इंच HD+ डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, Moto चा दमदार स्मार्टफोन येणार, किंमत 10 हजारांहून कमी

128GB स्टोरेज, तगडा बॅटरी बॅकअप, ‘हा’ स्मार्टफोन किफायतशीर दरात मिळणार

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.