AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mobile Addiction : झोपताना किती दूर ठेवावा मोबाईल? अनेकजण करतात या चूका

Mobile Addiction झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा हे बहुतेकांना माहीत नसते. जे लोकं मोबाईल जवळ ठेवून झोपतात, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डब्ल्यूएचओनेही याबाबत इशारा दिला आहे.

Mobile Addiction : झोपताना किती दूर ठेवावा मोबाईल? अनेकजण करतात या चूका
मोबाईल किती दूर ठेवावा?Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 07, 2023 | 8:48 PM
Share

मुंबई : आज मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोकांना मोबाईलचे इतके व्यसन (Mobile Addiction) लागले आहे की सकाळी उठल्याबरोबर फोन हवाच. एवढेच नाही तर जेवताना आणि झोपतानाही लोकं फोन सोडत नाहीत. याला मोबाईलचे व्यसन म्हणणे चुकीचे नाही. मात्र ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून आता सावध राहण्याची वेळ आली आहे. काही लोकांना मोबाईल उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. यामुळे खूप नुकसान होते.

झोपताना किती दूर ठेवावा मोबाईल?

झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा हे बहुतेकांना माहीत नसते. जे लोकं मोबाईल जवळ ठेवून झोपतात, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डब्ल्यूएचओनेही याबाबत इशारा दिला आहे. प्यूने एका अहवालात म्हटले आहे की, 90 टक्के किशोरवयीन आणि 68 टक्के प्रौढ लोकं मोबाईल उशी जवळ ठेवून झोपतात.

जरी यासाठी कोणतेही लेखी मानक किंवा निकष नाहीत. पण मोबाईलमधून बाहेर पडणारे रेडिएशन टाळण्यासाठी झोपताना ते दूर ठेवणे चांगले. मोबाईल तुमच्या बेडरूमपासून दूर ठेवणे चांगले. हे शक्य नसेल तर झोपताना मोबाईल किमान 3 फूट दूर ठेवा. असे केल्याने मोबाइलमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रो मॅग्नेटिकची शक्ती कमी होते. अशा प्रकारे तुम्हाला रेडिएशनचा त्रास होत नाही. म्हणूनच फोन उशीखाली ठेवून झोपू नका.

मोबाईल रेडिएशनच्या परिणामाचे काही संकेतही मिळत आहेत. जे लोकं मोबाईल सोबत ठेवून झोपतात त्यांना धोक्यांबाबत WHO ने इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि प्रजनन क्षमता देखील प्रभावित होते. मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश झोपेला प्रेरित करणाऱ्या हार्मोन्सचा समतोलही बिघडवतो. त्यामुळे झोप येण्यास त्रास होतो आणि जैविक चक्रही बिघडते.

Follow Us
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार...
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार....
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?.
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच.