AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mobile Restart: फोन रिस्टार्ट करण्याचे अनेक फायदे; वर्षानुवर्षे मोबाईल वापरणाऱ्यांना नाही माहिती

Smartphone Reboot: अनेकदा मोबाईल डोकं फिरल्यासारखं वागतो. एक फीचर उघडायला जावं तर दुसरंच उघडतं. मग अशावेळी अनेक जण डोक्याला फारसा ताण न घेता सरळ मोबाईल रिबूट अथवा रिस्टार्ट करतात. काय होतो त्याने फायदा? तुम्हाला माहिती आहे का?

Mobile Restart: फोन रिस्टार्ट करण्याचे अनेक फायदे; वर्षानुवर्षे मोबाईल वापरणाऱ्यांना नाही माहिती
मोबाईल रिस्टार्ट
| Updated on: Nov 29, 2025 | 3:40 PM
Share

Smartphone Tips in Marathi : मोबाईल फोन तर आता प्रत्येकाच्या खिशात आहेत. स्मार्टफोन, हटके फीचर्स असलेले विविध फोनने बाजार फुलला आहे. पण सतत मोबाईलवर पडीक असणाऱ्या अनेकांना फोनच्या रीस्टार्ट बटणाचा फायदा काय आहे हे मात्र माहिती नसते. फोन रीस्टार्ट करण्याचा एक वा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. त्यामुळे फोनची कामगिरीच सुधारत नाही, तर इतर ही अनेक फंक्शन व्यवस्थित काम करतात. जसा आपल्याला कामातून ब्रेक घ्यावा वाटतो. एक दिवसाची सुट्टी हवी असते. अगदी तसेच तुमच्या मोबाईलला सुद्धा हक्काचा ब्रेक घ्यावासा वाटतो.

गती आणि कामगिरीत सुधारणा

फोन रीस्टार्ट केल्याने रॅम स्वच्छ होते. त्यातील कचरा कमी होतो. फोन रीस्टार्ट केल्याने रॅममधील अनावश्यक साचलेल्या अनेक फाईल्सचा कचरा निघून जातो. ॲप जरी बंद असले तरी हे ॲप बॅकग्राऊंडमध्ये सुरूच असतात. त्यामुळे फोनची रॅम सतत भरत असते. फोनची गती मंदावते. फोन रीस्टार्ट झाल्यावर रॅममध्ये ज्या गोष्टी बॅकग्राऊंडला सुरू असतात. त्या सर्व बंद होतात. फोनचा स्पीड आणि परफॉर्मेन्स सुधारतो.

कनेक्टिव्हिटीची समस्या दूर

जर वाय-फाय, ब्लूटूथ अथवा सेल्यूलर डेटा कनेक्टिव्हिटीची अडचण येत असेल तर लागलीच फोन रीस्टार्ट करा. ही अडचण दूर होईल. वायफाय ऑन असले तरी अनेकदा इंटरनेट येत नाही. अशावेळी फोन रीस्टार्ट मोडवर टाकल्यावर ही समस्या दूर होते. नव्यान दमाने इंटरनेट जोरात पळते. तर मोबाईलचे इंटरनेट काम करत नसेल तर अनेक जण स्मार्टफोन रिबूटचा पर्याय निवडतात. त्यामुळे इंटरनेटची समस्या चुटकीसरशी दूर होते.

मोबाईल फोन हँग होण्याची अडचण दूर

जर फोन सतत हँग होत असेल तर फोन रीस्टार्ट करणे फायद्याचे ठरे. यामुळे फोनच्या अंतर्गत असलेल्या फाईल्स गायब होतात आणि फोनवरील ताण, भार कमी होतो. जर फोन सतत हँग होत असेल तर एक दोनदा रिबूट करून पाहा. ही अडचणी सुटू शकते. एकंदरीत पाहाता फोन रीस्टार्ट केल्यास मेमरी रिफ्रेश होते. ॲपमधील गडबड दूर होतात. तर फोनच्या सिस्टीममधील काही समस्याही दूर होतात.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा