AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

35 किंवा 65 रुपयांचा रिचार्ज करा, अन्यथा सिम बंद होणार?

मुंबई : बँकांप्रमाणेच अकाऊंटमधील कमी बॅलेंससाठी आता टेलीकॉम कंपन्याही वापरकर्त्यांना मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या सिम कार्डमध्ये रिचार्ज करायला सांगितले जाईल, नाही तर तुमचा नंबर बंद होईल. प्रीपेड वापरकर्त्यांना सिमकार्डमध्ये 35 रुपयांचा रिचार्ज करा, असे टेक्स्ट मेसेज कंपनीकडून पाठवण्यात येत आहेत. पण कुठल्या सिममध्ये कितीचा रिचार्ज करायचा हे त्या कंपनीवर अवलंबून आहे. रिचार्ज […]

35 किंवा 65 रुपयांचा रिचार्ज करा, अन्यथा सिम बंद होणार?
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM
Share

मुंबई : बँकांप्रमाणेच अकाऊंटमधील कमी बॅलेंससाठी आता टेलीकॉम कंपन्याही वापरकर्त्यांना मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या सिम कार्डमध्ये रिचार्ज करायला सांगितले जाईल, नाही तर तुमचा नंबर बंद होईल. प्रीपेड वापरकर्त्यांना सिमकार्डमध्ये 35 रुपयांचा रिचार्ज करा, असे टेक्स्ट मेसेज कंपनीकडून पाठवण्यात येत आहेत. पण कुठल्या सिममध्ये कितीचा रिचार्ज करायचा हे त्या कंपनीवर अवलंबून आहे. रिचार्ज न केल्यास तुमचं सिम बंद केलं जाऊ शकतं.

पोस्टपेड वापरकर्त्यांवर हे नियम लागू होणार नाहीत. कारण ते महिन्याच्या अखेरीस त्यांच्या प्लॅननुसार पैसे भरतात.

सध्या सर्वच कंपन्यांनी आपले अनलिमिटेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्सची व्हॅलिडिटी एक महिना ते तीन महिन्यापर्यंत आहे. रिपोर्टनुसार एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीकडून ग्राहकांना वॉर्निंग मेसेज पाठवण्यात येत आहेत. ‘सुचना, तुमचा व्होडाफोन मोबाईल नंबर XXXXXXXXXX बंद केला जाऊ शकतो. असुविधा टाळण्यासाठी अनलिमिटेड ऑल राउंडर रिचार्ज कारावा’, असा मेसेज व्होडाफोन कंपनीकडून पाठवण्यात येत आहे.

हा मेसेज व्होडाफोनच्या त्या वापरकर्त्यांना पाठवला जात आहे, ज्यांच्या अकाऊंटमध्ये मिनीमम बॅलेंस आहे. तुमच्या व्होडाफोन सिमला सुरु ठेवण्यासाठी तुमच्या सिममध्ये कमीतकमी 65 रुपयांचा बॅलेंस असणं आवश्यक आहे.

काही दिवस तुम्हाला असे मेसेज पाठवण्यात येतील, जर त्यानंतरही तुम्ही रिचार्ज केला नाही तर तुमची आऊटगेइंग सेवा आणि मोबाईल डेटा बंद करण्यात येईल. त्यानंतरही जर तुम्ही रिचार्ज केला नाही तर तुमची इनकमिंग सेवा बंद केली जाईल. त्यानंतर तुम्ही कधी पर्यंत रिचार्ज करु शकता याचा एक मेसेज तुम्हाला पाठवण्यात येईल. तुम्हाला रिचार्ज करुन सिम पुन्हा अॅक्टिव्हेट करावे लागेल. नाहीतर तुमच्या सिमवरील सर्व सेवा बंद करण्यात येतील.

त्यामुळे जर तुमच्या एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीच्या सिमवरील सेवा बंद झाल्या असतील तर लगेच रिचार्ज करा.

Follow Us
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप
मराठा आरक्षणावर ठाम भूमिका: निर्णायक आंदोलनाचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा