AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यांपासून इतकी दूर ठेवा मोबाईल स्क्रीन, नाही तर होणार मोठे नुकसान, पाहा डिटेल्स

स्मार्टफोनमुळे तरुणांपासून वृद्धापर्यंत साऱ्यांची दृष्टी कमजोर होऊ लागली आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना काळजी घ्यायाला हवी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डोळ्यांपासून इतकी दूर ठेवा मोबाईल स्क्रीन, नाही तर होणार मोठे नुकसान, पाहा डिटेल्स
smartphone close to eyes is danger for healthImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Aug 08, 2024 | 8:33 PM
Share

आजकालची पिढी बघावे तेव्हा स्मार्टफोन स्क्रीनला नाक लावून बसलेली असते. स्मार्टफोन्स शिवाय आता कोणतेही काम होणे अशक्य आहे. बॅंकींगपासून ते ऑफिसची कामे देखील आता मोबाईलवर होऊ लागली आहेत. लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग बनलेला स्मार्टफोन आपल्या डोळ्यांची दृष्टी देखील खराब करीत आहे. त्यामुळे अनेकांची डोळ्याची दृष्टी देखील कमी होत चालली आहे. त्यामुळे चाळीशीच्या आधीच तरुणांना चश्मे लागू लागले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन डोळ्याच्या अंतरापासून किती दूर ठेवावा याबाबत काय सांगितले जाते माहिती…

डोळ्यापासून किती दूर ठेवावा स्मार्टफोनचा डिस्प्ले

कोणत्याही स्मार्टफोनची स्क्रीन डोळ्यांपासून किमान 16 ते 24 इंचापर्यंत दूर ठेवायला हवी. या अंतरावर मोबाईल स्क्रीन ठेवल्याने डोळ्यांवर तणाव येत नाही. तसेच डोळ्यांचे आरोग्य देखील चांगले होते. तसेच स्मार्टफोनच्या स्क्रीनची ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट लेव्हल देखील योग्य पातळीवर राहायला हवी.

काय म्हणतो नियम?

वास्तविक स्मार्टफोन कोणत्याही डिव्हाईसच्या स्क्रीनचा वापर करताना एक नियम असतो. या नियमाला फॉलो केल्याने डोळ्यांना आराम मिळतो. या नियमाला 20-20-20 असे म्हणतात. हा एक खूप महत्वाचा नियम म्हटला जातो. या नियमामुळे डोळ्यांचे आयुष्य वाढते. या नियमानूसार दर 20 मिनिटाला 20 सेंकदासाठी 20 फूट अंतरावरील वस्तू पाहण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि त्यामुळे डोळे आरोग्यदायी राहातात.

डोळ्याचे स्नायू पेशींना आराम

आपण जण कोणत्याही बारीक अक्षरांना सातत्याने पाहील्याने डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. त्यामुळे स्मार्टफोनची स्क्रीनला सातत्याने पाहील्याने डोळ्यांवर तणाव येतो. यामुळे डोळ्यात रुक्षपणा वाढतो. डोळे जळजळतात आणि धूसर होते. परंतू 20-20-20 नियमाने डोळ्याचे स्नायू पेशींना खूप आराम मिळतो. तसाच रिलॅक्स होण्याचा वेळ देखील मिळतो. ज्यामुळे तुमचे डोळे देखील सुरक्षित राहतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.