AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड, तक्रारींनंतर कंपनीने विक्री रोखली

स्मार्टफोन कंपनी शाओमीच्या एका स्मार्टफोनमध्ये अंड्रॉयड अपडेटचा पर्याय मिळाला होता. अंड्रॉयड अपडेट केल्यानंतर स्मार्टफोन वापरताना युजर्सना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत.

Xiaomi च्या 'या' स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड, तक्रारींनंतर कंपनीने विक्री रोखली
| Updated on: Jan 05, 2021 | 8:42 AM
Share

मुंबई : स्मार्टफोन कंपनी शाओमीच्या (Xiaomi) एका स्मार्टफोनमध्ये अंड्रॉयड अपडेटचा पर्याय मिळाला होता. त्यानुसार युजर्सनी अंड्रॉयड अपडेट केल्यानंतर स्मार्टफोन वापरताना युजर्सना अनेक अडचणी येऊ लागल्या. तर काही युजर्सचा फोन बंद पडला आहे. याबाबत अनेक युजर्सकडून तक्रारी येऊ लागल्या. अखेर कंपनीने या तक्रारींकडे लक्ष दिले आणि भारतात या फोनची विक्री रोखली आहे. Mi A3 असं या स्मार्टफोनचं नावं आहे. (Xiaomi stops roll-out of Mi A3 devices after users complaints)

दरम्यान, अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे कंपनीकडे तक्रार केली होती. काहींनी तक्रार केली आहे की, “अंड्रॉयड 11 अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर त्यांचा फोन बंद पडला आहे”. शाओमी इंडियाने (Xiaomi India) सोमवारी याबाबत एक निवेदन जारी केलं आहे, त्यात कंपनीने म्हटलं आहे की, “Mi A3 या डिव्हाईसमध्ये नुकताच अंड्रॉयड 11 अपडेटचा पर्याय देण्यात आला होता. या अपडेटनंतर फोनबाबत युजर्सच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आम्ही हे अपडेट रोखलं आहे”.

Xiaomi कंपनीने 21 ऑगस्ट रोजी भारतात Mi A3 हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. दरम्यान काही युजर्सनी तक्रार केली आहे की, “शाओमी सेंटर्समध्ये हा फोन दुरुस्त करण्यासाठी खूप जास्त पैसे मागितले जात आहेत”. याबाबत विचारले असता कंपनीने म्हटलं आहे की, “सर्व्हिस सेंटर्समध्ये युजर्सचा हा फोन मोफत दुरुस्त करुन दिला जाईल. यामध्ये स्मार्टफोनची वॉरंटी पाहिली जाणार नाही”.

मार्केट रिसर्च कंपनी आईडीसीच्या रिपोर्टनुसार 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत शाओमीची भारतीय बाजारात 25 टक्के हिस्सेदारी होती. यासह कंपनी भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान, कंपनीने Mi A3 मधील झालेल्या बिघाडाबाबत म्हटले आहे की, “युजर्सना होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. एक ब्रँड म्हणून आम्हाला ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव द्यायचा आहे. आम्ही आमची उत्पादने आणि सेवा सतत सुधारत राहू. ”

Xiaomi चा हा लेटेस्‍ट स्‍मार्टफोन स्‍टॉक अँड्रॉयड सॉफ्टवेअरसह येतो. फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. सोबत एक 8 मेगापिक्सलची लेन्स आणि 2 मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Special Story | 5G सह अपग्रेडेड तंत्रज्ञान आणि जबरदस्त फिचर्स असणारे स्मार्टफोन्स 2021 मध्ये लाँच होणार

Xiaomi च्या ‘या’ फोनचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या 5 मिनिटात 3.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री

(Xiaomi stops roll-out of Mi A3 devices after users complaints)

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.