AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Story | एका वर्षापूर्वी बायको गेली, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 कोटीची संपत्ती दान

Special Story : आपली संपत्ती दान करताना राजेंद्र यांनी आपली गाडी, घर तसंच आपल्या मालकीची जमीनदेखील सरकारच्या नावावर केली आहे. 23 जुलै 2021 रोजी त्यांनी आपली संपत्ती सरकारच्या नावे केल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे.

Love Story | एका वर्षापूर्वी बायको गेली, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 कोटीची संपत्ती दान
पाच कोटीची संपत्ती दान करणारा डॉक्टर
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 5:55 PM
Share

बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरा जन्मभर धडपडत असतो. बायकोचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, इतकं प्रेम करणारे पती आजही या जगात आहेत, हे दाखवून देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एकानं बायकोच्या मरणानंतरही तिचा शब्द प्रमाण ठेवत तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठा धाडसी निर्णय घेतलाय. एका डॉक्टर पतीनं चक्क आपली पाच कोटी रुपयांची संपत्ती बायकोच्या शब्दाखातर दान केली आहे. अत्यंत हृदयस्पर्शी असणाऱ्या या लव्हस्टोरीचं (Love Story) वृत्त आजतकनं दिलं आहे. हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) एका डॉक्टरनं आपल्या पत्नीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांची संपत्ती दान केली आहे. आहे. डॉक्टर पतीनं आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर हा निर्णय घेतलाय. या दाम्पत्याला अपत्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपली पाच कोटी रुपयांची संपत्ती थेट सरकारलाच दान दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

कुणी दिली दान?

हिमाचल प्रदेशातील हमीरपूर या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका निवृत्त डॉक्टरनं आपली पाच कोटी रुपयांची संपत्ती हिमाचल प्रदेश सरकारला दान दिली आहे. या डॉक्टरनं तयार दिलेलं हे दान संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनलंय. आपल्या बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर पतीननं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.

असं का केलं?

हिमाचल प्रदेशच्या नादौनमधील जोसलप्पड गावातील डॉक्टर राजेंद्र कंवर राहतात. ते आरोग्य विभागात काम करायचे आता निवृत्त झाले असून त्यांची पत्नी शिक्षण खात्यात नोकरीला होता. दोघंही निवृत्त झाली आहे. या दोघांनाही मूलबाळ नाही. एक वर्षापूर्वी राजेंद्र यांची पत्नी कृष्णा कंवर यांचं निधन झालं. त्यानंतर राजेंद्र यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत अखेर चर्चा करत, मूल बाळ नसल्यामुळे आपली संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल पाच कोटी रुपयांची संपत्ती राजेंद्र यांनी आपल्या पत्नीच्या अखेरच्या इच्छेखातर दान केली आहे.

आपली संपत्ती दान करताना राजेंद्र यांनी आपली गाडी, घर तसंच आपल्या मालकीची जमीनदेखील सरकारच्या नावावर केली आहे. 23 जुलै 2021 रोजी त्यांनी आपली संपत्ती सरकारच्या नावे केल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. आपल्या घरात बेघर वरीष्ठ नागरिकांना राहण्यासाठी आपल्या घरात स्थान मिळावं, या उदात्त भावनेनं त्यांनी आपलं घर, जमीन आणि गाडी दान केली आहे. म्हातारपणात वरिष्ठांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी त्यांनी पत्नीच्या इच्छेनुसार तिच्या मृत्यूनंतर आपल्या कोट्यवधींची संपत्ती दान केली आहे.

संबंधित बातम्या :

Special Story | ‘लेडी सिंघम’ मोक्षदा पाटील यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत कसे अडकले आस्तिककुमार?

Special Story | जिगरबाज IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांचं अरेंज ते लव्ह मॅरेज

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.