AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाफेप्रमाणे गायब होतात या देशातील लोक, राज की बात! काय आहे Johatsu? वाचून वेड लागेल

असे लोक जे नेहमीप्रमाणे नोकरीसाठी किंवा त्यांच्या नित्यक्रमासाठी घराबाहेर पडले आणि परत आले नाहीत.

वाफेप्रमाणे गायब होतात या देशातील लोक, राज की बात! काय आहे Johatsu? वाचून वेड लागेल
Johatsu JapanImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 11, 2023 | 5:30 PM
Share

भारतात आयुष्याला वैतागल्यावर लोक हिमालयात जाण्याची भाषा करतात, संन्यास घेण्याची भाषा करतात. जेणेकरून त्यांना तिथे आरामदायी जीवन जगू शकतील. परंतु आपणास माहित आहे काय की असा एक देश आहे जो अनेक दशकांपासून भारताच्या याच गोष्टीचे अनुसरण करीत आहे? जपान असं या देशाचं नाव आहे. जिथे घर सोडून गायब होणाऱ्या लोकांना जोहत्सू म्हणतात.

जपानी भाषेत जोहत्सू म्हणजे वाफेप्रमाणे उडणे. यात कुटुंब किंवा नोकरीला कंटाळून लोक अचानक गायब होतात. मात्र, हे लोक आपले आयुष्य संपवत नाहीत, म्हणजेच आपल्या जीवाला हानी पोहोचवण्याऐवजी ते नव्या आयुष्याची सुरुवात करतात. या कामासाठी काही खासगी कंपन्या आता ठराविक शुल्क आकारून त्यांना वाफेप्रमाणे गायब होण्यास मदत करतात.

हे स्पष्ट आहे की जोहत्सू म्हणजे असे लोक जे नेहमीप्रमाणे नोकरीसाठी किंवा त्यांच्या नित्यक्रमासाठी घराबाहेर पडले आणि परत आले नाहीत. गायब होणाऱ्या या लोकांना जोहत्सू म्हणतात.

बहुतेक प्रकरणांमध्ये हे पाहिले गेले आहे की कुटुंबातील सदस्यांचा खूप शोध घेतल्यानंतरही कोणताही सुगावा लागत नाही. लोक अचानक गायब होण्यामागे कुटुंबातील सदस्य, नोकरीचा ताण किंवा कर्ज हे कारण आहे. अशा परिस्थितीत लोक गायब होण्याचा निर्णय घेतात.

जे लोक या कार्याला व्यवसाय बनवतात त्यांचे म्हणणे आहे की गहाळ होण्याचे कारण नेहमीच नकारात्मक नसते. अनेक वेळा लोक नवीन नोकरी सुरू करण्यासाठी किंवा नवीन लग्न करण्यासाठी हे करतात.

एका जपानी वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जोहत्सूवर अनेक दशके संशोधन करणारे समाजशास्त्रज्ञ हिरोकी नाकामोरिक म्हणतात की, 1960 च्या दशकात गायब झालेल्या लोकांसाठी हा शब्द प्रथम वापरला गेला.

जपानी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांच्या देशात घटस्फोटाच्या केसेस कमी होण्याचे कारणही जोहत्सूच आहे, कारण इथे घटस्फोट घेण्याची कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यापेक्षा जोहत्सू असणेच योग्य आहे, असे अनेकांना वाटते.

ही संकल्पना यशस्वी होण्याचे एक कारण म्हणजे जपानमध्ये गोपनीयतेबाबत अत्यंत कडक कायदे आहेत. बेपत्ता व्यक्ती गुन्हा किंवा अपघातात अडकल्याचा संशय आल्याशिवाय पोलिसांना सापडत नाही.

अशा परिस्थितीत हरवलेली व्यक्ती आपल्या एटीएममधून पैसे काढू शकते. तो आपल्या आयुष्यातील सर्व अपूर्ण कामे करू शकतो. मात्र, कायद्याचा फायदा होत नाही, तेव्हा हरवलेल्या व्यक्तीचे कुटुंबीय खासगी गुप्तहेरांची मदत घेतात. त्यामुळे शेजारी देशांपेक्षा इथे खासगी प्रतिनिधी संस्थांची संख्याही अधिक आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.