AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत चक्कर येतेय, ‘या’ लक्षनांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष, जाणून घ्या नेमकं कारण काय?

आजच्या धावपळीच्या जीवनात आपलं स्वतःकडे लक्ष नसतं. ज्यामुळे अनेक समस्या डोकं वर काढतात. त्यापैकी एक समस्या म्हणजे, सतत चक्कर येणं. अनेकांना आराम केल्यानंतर देखील थकवा जाणवतो... याकडे दुर्लक्ष करुन मुळीच चालणार नाही... जाणून यामागे नेमकं कारण काय असेल.

सतत चक्कर येतेय, 'या' लक्षनांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष, जाणून घ्या नेमकं कारण काय?
| Updated on: Jun 27, 2026 | 1:48 PM
Share

सध्या पाहिलं तर, वातावरणात सतत बदल होत आहेत, ज्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. अनेक जण तर कामाच्या गडबडीत सर्वकाही विसरून जातात. आरोग्याकडे ते कधीच लक्ष देत नाही. हे पुढे जाऊन धोक्याचं ठरू शकचं… अनेक लोक सामान्य थकवा, हवामानातील बदल किंवा तणावामुळे येणाऱ्या वारंवार चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही समस्या वाटते तितकी सोपी नाही. कधीकधी हे शरीरातील आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. पण चक्कर येण्याचं एकमेव कारण जीवनसत्त्वांची कमतरता नाही. कमी रक्तदाब, ॲनिमिया, शरीरातील पाण्याची कमतरता आणि इतर आरोग्य समस्यांमुळेही चक्कर येऊ शकते, त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या आणि ती म्हणजे, कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे चक्कर येऊ शकते आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चक्कर येऊ शकते?

व्हिटॅमिन बी12, फोलेट (व्हिटॅमिन बी9) आणि व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळे देखील चक्कर येऊ शकते. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी12 आणि फोलेट आवश्यक असतात. यांच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो, ज्यामुळे मेंदू आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने चक्कर येणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि तोल जाऊ शकतो. यामुळे काही लोकांना चक्कर किंवा अस्थिरता जाणवू शकते.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका…

जर तुम्हाला चक्कर येण्यासोबतच खालील लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. श्वास लागणे, अंधुक दृष्टी, हात आणि पायांना मुंग्या येणे, चालण्यात अडचण, बेशुद्ध होणे, तीव्र डोकेदुखी किंवा छातीत दुखणे… यांसारख्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आहारात बदल करा.

जर तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल, तर स्वतःहून औषधोपचार करू नका किंवा व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक रक्त तपासण्या करून घ्या. संतुलित आहार, भरपूर पाणी आणि चांगली झोप आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. जर चक्कर येण्यासोबतच छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, बोलण्यास अडचण येणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसत असतील, तर तात्काळ वैद्यकीय मदत घेणे अत्यावश्यक आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला