AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाही दोन मजली घरं, नाही सोनार रात्री थांबत… डोली गावाच्या “या” नियमांमागचे कारण काय?

हे गाव आधुनिकतेसोबतच श्रद्धा आणि परंपरेशी घट्टपणे जोडलेलं आहे. गावात असे काही नियम आहेत, ज्यांचे पालन न केल्यास संकट ओढावते, अशी स्थानिकांची धारणा आहे. या पार्श्वभूमीवर डोली गावाची ही अनोखी गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे.

नाही दोन मजली घरं, नाही सोनार रात्री थांबत… डोली गावाच्या या नियमांमागचे कारण काय?
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: May 03, 2025 | 3:52 PM
Share

विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरीही जोधपूरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेलं डोली गाव आजही श्रद्धा आणि संताच्या वचनांवर चालतं. जोधपूर-बाडमेर महामार्गालगत वसलेलं हे गाव आपल्या आगळ्या परंपरांसाठी ओळखलं जातं.

200 वर्षांची संत परंपरा आजही जपली जाते : गावात आजही काही ठराविक नियम काटेकोरपणे पाळले जातात. येथे कोणीही दोन मजली घरं बांधत नाही, सोनार रात्री गावात थांबत नाहीत आणि गावात कुठेही तेल काढण्यासाठी घाणी चालवल्या जात नाहीत. हे नियम केवळ सामाजिक शिस्तीमुळे नव्हे, तर संत हरिराम बैरागी यांच्या वचनांमुळे आजवर कायम आहेत.

खेजडीचे झाड : गावकऱ्यांच्या मते, दोन शतके पूर्वी बैरागी महाराजांनी येथे तपश्चर्या केली होती. तपश्चर्येच्या वेळी त्यांनी जमिनीत सुकलेल्या लाकडाची एक काठी रोवली होती. आज त्या ठिकाणी उभं असलेलं खेजडीचं मोठं झाड या घटनेची साक्ष आहे. बैरागी महाराजांनी गावकऱ्यांना सांगितलं होतं की, गावाच्या चारही दिशांनी कच्च्या दूध आणि सुक्या नारळाच्या ज्योतांनी आरती करून संरक्षण तयार करा. त्यानंतर गावात कधीच कोणतंही मोठं संकट आलं नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

राजामहाराजांच्या काळात, कविराज मुरारीलाल चारण यांना जोधपूरच्या राजाकडून 12 गावे देण्यात आली होती, त्यामध्ये डोली गावाचाही समावेश होता. मुरारीलाल यांनी बैरागी महाराजांना गावात करणी मातेचं मंदिर बांधण्याची विनंती केली होती, जी पूर्ण झाली. या मंदिरामुळे गावातील धार्मिक आस्था आणखी दृढ झाली.

गावकऱ्यांनी सांगितले की, काही लोकांनी दोन मजली घरं बांधून परंपरेचा भंग केला होता. मात्र, त्यांना त्यात राहताच आलं नाही. कोणाला विचित्र आवाज ऐकू येऊ लागले, कोणाच्या कुटुंबात अचानक मृत्यू झाले, तर काही जण गंभीर आजारांनी त्रस्त झाले. या घटनांमुळे गावकरी अधिकच सतर्क झाले आणि परंपरेचं पालन अधिक निष्ठेने करू लागले.

आजही डोली गाव विज्ञानाच्या युगातही श्रद्धा, परंपरा आणि संतांच्या वचनांवर आधारित जीवनशैली जपतो आहे. हे गाव म्हणजे आध्यात्म, सामाजिक शिस्त आणि लोकसहभागाचं अद्वितीय उदाहरण ठरतंय.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा