AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाही दोन मजली घरं, नाही सोनार रात्री थांबत… डोली गावाच्या “या” नियमांमागचे कारण काय?

हे गाव आधुनिकतेसोबतच श्रद्धा आणि परंपरेशी घट्टपणे जोडलेलं आहे. गावात असे काही नियम आहेत, ज्यांचे पालन न केल्यास संकट ओढावते, अशी स्थानिकांची धारणा आहे. या पार्श्वभूमीवर डोली गावाची ही अनोखी गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे.

नाही दोन मजली घरं, नाही सोनार रात्री थांबत… डोली गावाच्या या नियमांमागचे कारण काय?
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 3:52 PM
Share

विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरीही जोधपूरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेलं डोली गाव आजही श्रद्धा आणि संताच्या वचनांवर चालतं. जोधपूर-बाडमेर महामार्गालगत वसलेलं हे गाव आपल्या आगळ्या परंपरांसाठी ओळखलं जातं.

200 वर्षांची संत परंपरा आजही जपली जाते : गावात आजही काही ठराविक नियम काटेकोरपणे पाळले जातात. येथे कोणीही दोन मजली घरं बांधत नाही, सोनार रात्री गावात थांबत नाहीत आणि गावात कुठेही तेल काढण्यासाठी घाणी चालवल्या जात नाहीत. हे नियम केवळ सामाजिक शिस्तीमुळे नव्हे, तर संत हरिराम बैरागी यांच्या वचनांमुळे आजवर कायम आहेत.

खेजडीचे झाड : गावकऱ्यांच्या मते, दोन शतके पूर्वी बैरागी महाराजांनी येथे तपश्चर्या केली होती. तपश्चर्येच्या वेळी त्यांनी जमिनीत सुकलेल्या लाकडाची एक काठी रोवली होती. आज त्या ठिकाणी उभं असलेलं खेजडीचं मोठं झाड या घटनेची साक्ष आहे. बैरागी महाराजांनी गावकऱ्यांना सांगितलं होतं की, गावाच्या चारही दिशांनी कच्च्या दूध आणि सुक्या नारळाच्या ज्योतांनी आरती करून संरक्षण तयार करा. त्यानंतर गावात कधीच कोणतंही मोठं संकट आलं नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

राजामहाराजांच्या काळात, कविराज मुरारीलाल चारण यांना जोधपूरच्या राजाकडून 12 गावे देण्यात आली होती, त्यामध्ये डोली गावाचाही समावेश होता. मुरारीलाल यांनी बैरागी महाराजांना गावात करणी मातेचं मंदिर बांधण्याची विनंती केली होती, जी पूर्ण झाली. या मंदिरामुळे गावातील धार्मिक आस्था आणखी दृढ झाली.

गावकऱ्यांनी सांगितले की, काही लोकांनी दोन मजली घरं बांधून परंपरेचा भंग केला होता. मात्र, त्यांना त्यात राहताच आलं नाही. कोणाला विचित्र आवाज ऐकू येऊ लागले, कोणाच्या कुटुंबात अचानक मृत्यू झाले, तर काही जण गंभीर आजारांनी त्रस्त झाले. या घटनांमुळे गावकरी अधिकच सतर्क झाले आणि परंपरेचं पालन अधिक निष्ठेने करू लागले.

आजही डोली गाव विज्ञानाच्या युगातही श्रद्धा, परंपरा आणि संतांच्या वचनांवर आधारित जीवनशैली जपतो आहे. हे गाव म्हणजे आध्यात्म, सामाजिक शिस्त आणि लोकसहभागाचं अद्वितीय उदाहरण ठरतंय.

Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.