AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dating App चे सर्वेक्षण! 77 टक्के भारतीय महिला लग्नानंतर आपल्या जोडीदाराला फसवतात

जग जसजसे डिजिटल होत आहे तसतसे हे संबंध अजून पाहायला मिळतायत. विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच पाहायला मिळतात, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.

Dating App चे सर्वेक्षण! 77 टक्के भारतीय महिला लग्नानंतर आपल्या जोडीदाराला फसवतात
Extra marital affairImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 29, 2023 | 6:11 PM
Share

सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रांमध्ये आपण अनेकदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सशी संबंधित बातम्या वाचतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतातही विवाहबाह्य संबंधांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जग जसजसे डिजिटल होत आहे तसतसे हे संबंध अजून पाहायला मिळतायत. विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच पाहायला मिळतात, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. विवाहबाह्य संबंधांसाठी वापरले जाणारे ग्लीडेन हे डेटिंग ॲप सध्या भारतात २० लाखांहून अधिक लोक वापरत आहेत. हे ॲप केवळ दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच नाही तर जयपूर, पाटणा, मेरठ, भोपाळ, इंदूर, लखनऊ, नोएडा, गुवाहाटी आणि विशाखापट्टणमसह अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. याचा वापर केवळ पुरुषच नव्हे तर मुली आणि स्त्रियाही करत आहेत.

आकडेवारीवर विश्वास ठेवला तर बेंगळुरू हे असे शहर आहे जिथे विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे सर्वाधिक पाहायला मिळतात. बेंगळुरूमधील युजर्स दररोज दीड तास ग्लीडेनचा वापर करतात. सहसा हे ॲप दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा रात्री 10:00 नंतर जास्त वापरले जाते.

सर्वेक्षणानुसार या डेटिंग ॲप वर पुरुष 24 ते 30 वयोगटातील महिलांचा शोध घेतात, तर महिला 30 ते 40 वयोगटातील पुरुषांचा शोध घेतात. नातेसंबंधांशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी या वेबसाईटने महिलांना कधी आपल्या जोडीदाराची फसवणूक केली आहे का, असे विचारले असता 10 पैकी 7 महिलांनी आपल्या जोडीदाराची फसवणूक केल्याचे सांगितले.

डेटिंग ॲप ग्लीडेनने केलेल्या सर्वेक्षणानुसार 77 टक्के महिलांनी लग्नानंतर आपल्या पतीला फसवले आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या वैवाहिक जीवनातील सुस्तपणा. नातेसंबंधांवरील एका तज्ज्ञाने सांगितले की, महिलांना लग्नानंतरच्या नात्यात भावनिक जिव्हाळा हवा असतो, जो त्यांना मिळत नाही. पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना शारीरिक जवळीक अधिक चांगली वाटते. विवाहबाह्य संबंध अधिक दिसून येण्याचे हे एक मोठे कारण आहे.

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....