AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dating App चे सर्वेक्षण! 77 टक्के भारतीय महिला लग्नानंतर आपल्या जोडीदाराला फसवतात

जग जसजसे डिजिटल होत आहे तसतसे हे संबंध अजून पाहायला मिळतायत. विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच पाहायला मिळतात, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.

Dating App चे सर्वेक्षण! 77 टक्के भारतीय महिला लग्नानंतर आपल्या जोडीदाराला फसवतात
Extra marital affairImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 29, 2023 | 6:11 PM
Share

सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रांमध्ये आपण अनेकदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सशी संबंधित बातम्या वाचतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतातही विवाहबाह्य संबंधांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जग जसजसे डिजिटल होत आहे तसतसे हे संबंध अजून पाहायला मिळतायत. विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच पाहायला मिळतात, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. विवाहबाह्य संबंधांसाठी वापरले जाणारे ग्लीडेन हे डेटिंग ॲप सध्या भारतात २० लाखांहून अधिक लोक वापरत आहेत. हे ॲप केवळ दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच नाही तर जयपूर, पाटणा, मेरठ, भोपाळ, इंदूर, लखनऊ, नोएडा, गुवाहाटी आणि विशाखापट्टणमसह अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. याचा वापर केवळ पुरुषच नव्हे तर मुली आणि स्त्रियाही करत आहेत.

आकडेवारीवर विश्वास ठेवला तर बेंगळुरू हे असे शहर आहे जिथे विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे सर्वाधिक पाहायला मिळतात. बेंगळुरूमधील युजर्स दररोज दीड तास ग्लीडेनचा वापर करतात. सहसा हे ॲप दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा रात्री 10:00 नंतर जास्त वापरले जाते.

सर्वेक्षणानुसार या डेटिंग ॲप वर पुरुष 24 ते 30 वयोगटातील महिलांचा शोध घेतात, तर महिला 30 ते 40 वयोगटातील पुरुषांचा शोध घेतात. नातेसंबंधांशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी या वेबसाईटने महिलांना कधी आपल्या जोडीदाराची फसवणूक केली आहे का, असे विचारले असता 10 पैकी 7 महिलांनी आपल्या जोडीदाराची फसवणूक केल्याचे सांगितले.

डेटिंग ॲप ग्लीडेनने केलेल्या सर्वेक्षणानुसार 77 टक्के महिलांनी लग्नानंतर आपल्या पतीला फसवले आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या वैवाहिक जीवनातील सुस्तपणा. नातेसंबंधांवरील एका तज्ज्ञाने सांगितले की, महिलांना लग्नानंतरच्या नात्यात भावनिक जिव्हाळा हवा असतो, जो त्यांना मिळत नाही. पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना शारीरिक जवळीक अधिक चांगली वाटते. विवाहबाह्य संबंध अधिक दिसून येण्याचे हे एक मोठे कारण आहे.

Follow Us
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.