AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज ना छोडूंगी तुझे…. नवरीने 20 किलोमीटर थरारक पाठलाग करून अखेर…

लग्नाला अवघा काही कालावधी उरलेला असताना वधू तयार होऊन वाट बघत होती. मात्र तेव्हाच काही कारणामुळे त्रस्त असलेल्या वराने लग्नमंडपात न येता पळ काढला.

आज ना छोडूंगी तुझे.... नवरीने 20 किलोमीटर थरारक पाठलाग करून अखेर...
| Updated on: May 24, 2023 | 11:38 AM
Share

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथे झालेल्या एका लग्नाची (marriage) सध्या खूपच चर्चा आहे. लग्न लागायच्या अवघे काही क्षण आधी नवरा मुलगा (groom ran away from marriage) वरातीतून पळून गेल्याचे वधूला कळले. मात्र त्यामुळे रडत न बसता नवरीने 20 किलोमीटर थरारक पाठलाग करून अखेर वराला पकडले त्याच्याशीच लग्न केले. त्या दोघांचाही प्रेमविवाह होता, पण लग्न लागण्याच्या काही क्षण आधीच नवऱ्या मुलाने कच खाल्ली आणि तो पळाला.

तो पळ काढण्याच्या तयारीत

लग्नाची ही अजब-गजब गोष्ट बरेलीतील बारादरी भागातील पुराना शहर येथील आहे. तेथे एक तरूणी वधूच्या वेशात तयार होती, पण तेव्हाच तिला कळलं नवरा मुलगा हा लग्नास तयार नाही. तो पळून जाण्याच्या तयारीत आहे. हे ऐकल्यावर वधूने लगेच त्याला फोन केला असता तो म्हणाला की मी आईला आणण्यासाठी बदायूं येथील घरी जात आहे. पण हे ऐकूनही वधूचे समाधान झाले नाही, तिला कसली तरी शंका आली अन् ती वराच्या शोधार्थ बाहेर पडली.

मंदिरात केले लग्न

बराच वेळ शोध घेतल्यानंतर नवरा मुलगा हा शहराबाहेरील एका पोलिस स्टेशन जवळील एका बसमध्ये बसलेला दिसला. नवरीने त्याला लगेचच बसमधून खाली उतरवले आणि जवळच्याच मंदिरात घेऊन गेली. तेथे त्या दोघांनी लग्न केले. सोशल मीडियावर दोघांच्याही लग्नाचे फोटो खूप व्हायरल होत असून या आगळ्या वेगळ्या लग्नाची बरीच चर्चाही सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होतं. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ते एकत्र होते. दोघांचेही कुटुंबियही लग्नासाठी तयार झाल होते. लग्नाची पूर्ण तयारीही झाली पण त्यापूर्वी वराचे मन बदलले आणि त्याने कच खात ऐनवेळी लग्नास नकार दिला. वधूला ही गोष्ट कळताच तिने तत्काळ धाव घेत 20 किलोमीटरपर्यंत जाऊन वराचा शोध घेतला आणि त्याच्याशीच लग्न केले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.