AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्या नावावर ! ‘या’ ठिकाणी बनते, चपाती बघण्यासाठी लाखोंची गर्दी

सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही भारताच्या नावावर आहे. सर्वात मोठ्या चपातीचे वजन सुमारे 145 किलो होते. सर्वात मोठी चपाती खास प्रसंगी बनवली जाते आणि ही एक चपाती शेकडो लोकांचे पोट भरते. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात मोठी चपाती भारतातील कोणत्या शहरात बनवली जाते.

सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्या नावावर ! 'या' ठिकाणी बनते, चपाती बघण्यासाठी लाखोंची गर्दी
Biggest chapati in the world jamnagar gujaratImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 12, 2023 | 11:51 AM
Share

गांधीनगर: भारतीय खाद्यपदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. परदेशी लोकही भारतीय खाद्यपदार्थ मोठ्या आवडीने खातात. चपाती हा भारतीय जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि नानपासून रोटीपर्यंत लोकांना तो खूप आवडतो. पण तुम्हाला माहित आहे का की सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही भारताच्या नावावर आहे. सर्वात मोठ्या चपातीचे वजन सुमारे 145 किलो होते. सर्वात मोठी चपाती खास प्रसंगी बनवली जाते आणि ही एक चपाती शेकडो लोकांचे पोट भरते. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात मोठी चपाती भारतातील कोणत्या शहरात बनवली जाते.

जगातील सर्वात मोठी चपाती कशी बनवली जाते?

जगातील सर्वात मोठी भाकरी गुजरातमधील जामनगरमध्ये बनवली जाते. ती तयार करण्यासाठी खूप लोक लागतात. भाकरी जळू नये म्हणून मंद आचेवर तयार केली जाते. बनवल्यानंतर शेकडो लोकांमध्ये त्याचे वाटप केले जाते. जेव्हा ही चपाती बनवली जाते, तेव्हा ती पाहण्यासाठी सर्व लोक जमतात.

सर्वात मोठी चपाती कधी बनवली जाते?

जगातील सर्वात मोठी चपाती एका खास प्रसंगी बनवली जाते. जामनगरमधील जलाराम बापा आणि दगडू सेठ गणपती सार्वजनिक उत्सवाच्या जयंतीला जगातील सर्वात मोठी चपाती बनवली जाते. ही चपाती जलाराम मंदिराच्या जीर्णोद्धार समितीकडून बनवली जाते. ही चपाती मंदिरात येणाऱ्या सर्व लोकांना दिली जाते. जामनगरच्या बाहेरूनही अनेक जण ही चपाती पाहण्यासाठी येतात.

खास तवा बनवला…

विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी चपाती बनवण्यासाठी एक नव्हे तर अनेक महिलांना एकत्र यावे लागते. मग तासन् तासांच्या मेहनतीनंतर ही चपाती तयार केली जाते. यासाठी भरपूर गव्हाचे पीठ लागते. जेव्हा ही चपाती तयार होते तेव्हा तिचे वजन सुमारे 145 किलोपर्यंत असते. ही चपाती बनविण्यासाठी मंदिर समितीने खास तवा बनवला आहे. ही चपाती बनवण्यासाठी बरेच लोक लागतात.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.