AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेरणादायक! बारावीत नापास झाल्या, अन् वयाच्या 22 वर्षी IAS बनल्या, वाचा अंजू शर्माची कहाणी…

अंजू शर्मा बारावीत असताना त्या अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या. तसंच त्या दहावीत असताना विज्ञानच्या पेपरमध्ये त्या प्री-बोर्डमध्येही नापास झाल्या होत्या. पण आता त्या आयएएस अधिकारी म्हणून काम करत आहेत.

प्रेरणादायक! बारावीत नापास झाल्या, अन् वयाच्या 22 वर्षी  IAS बनल्या, वाचा अंजू शर्माची कहाणी...
अंजू शर्मा
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 27, 2022 | 4:44 PM
Share

मुंबई : आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या अपयशाने (Failure) आपण खचून जातो. पण काही लोकांची जीवनकहानी वाचली की प्रेरणा मिळते. आपणही काही करून दाखवण्याची इच्छा निर्माण होते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हालाही प्रेरणा मिळेल. ही कहाणी आहे IAS अधिकारी अंजू शर्मा (Anju Sharma) यांची त्या बारावीत असताना त्या एका विषयात नापास झाल्या होत्या पण मग पुढे त्यांनी प्रगती केली. अन त्या IAS अधिकारी झाल्या. विशेष म्हणजे त्यांनी वयाच्या केवळ 22 वर्षी हे यश संपादन केलंय.

अंजू शर्मा बारावीत असताना त्या अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या. तसंच त्या दहावीत असताना विज्ञानच्या पेपरमध्ये त्या प्री-बोर्डमध्येही नापास झाल्या होत्या. पण आता त्या आयएएस अधिकारी म्हणून काम करत आहेत.

या यशाबद्दल अंजू शर्मा म्हणाल्या यांनी आपलं मत मांडलं आहे. त्या म्हणाल्या की, “माझ्या आयुष्यातील या दोन घटनांनी माझे भविष्य घडवलं , असं मला वाटतं. प्री-बोर्ड दरम्यान मला खूप अभ्यास करायचे त्यासाठी वेळप्रसंगी जेवणही करायेच नाही. मग माहित नाही पण मी या परिक्षेला घाबरायला लागले. मला वाटू लागलं की मी नापास होईल, अन् तसंच झालं. त्यावेळी मला वाईट वाटलं पण मग मी खूप जास्त अभ्यास केला. अन् आयएएस व्हायचं ठरवलं. पहिल्याच प्रयत्नात मी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आणि आता आयएएस म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. याचा मला खूप आनंद आहे. मी इतरांनाही सांगू इच्छिते की तुम्ही येणाऱ्या अपयशाने खचू नका. प्रयत्न करा. तुम्हाला यश जरूर मिळेल.”

अंजू शर्मा यांनी 1991 मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या सध्या गांधीनगरच्या प्रधान सचिव आहेत. त्यांनी गांधीनगर इथे जिल्हाधिकारी म्हणून आणि भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केलं आहे. त्यांनी NRHM मध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवा केली आहे.

तसं युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे. त्यासाठी मेहनत लागते तासनतास अभ्यासाची साधना लागते. आपण ठरवलं तर काही करू शकतो हेच अंजू यांनी दाखवून दिलंय.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत