AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोळकी दंगलीत जग जाळायला निघाली त्यावेळेस वर्दी देवदूत झाली, नेत्रेश शर्माचं प्रमोशन, नेटकरी म्हणतात, ‘अजूनही माणुसकी जिवंत’

गुढीपाडव्याच्या दिवशी राजस्थानमधील करौलीमध्ये हिंसाचार उसळला. ठिकठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या आगीत अनेक घरं आणि दुकानं, वाहनं जाळली गेली. या घटनेवेळी कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा तिथे होते त्यांनी आगीशी दोन हात करून एका कुटुंबातील लहान मुलाचा जीव वाचवला. त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. त्यांच्या या कृती सर्वत्र कौतुक होतंय.

टोळकी दंगलीत जग जाळायला निघाली त्यावेळेस वर्दी देवदूत झाली, नेत्रेश शर्माचं प्रमोशन, नेटकरी म्हणतात, 'अजूनही माणुसकी जिवंत'
नेत्रेश शर्मा यांनी वाचवला चिमुकल्याचा जीव, सोशल मीडियावर कौतुक
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Apr 05, 2022 | 12:51 PM
Share

मुंबई : अनेकदा सर्वसामान्य लोक संकटात असताना पोलीस (Police) देवासारखे धावून येतात. नुकतंच राजस्थानमध्ये (Rajsthan) एक घटना घडली. यात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. राजस्थानमधील करौली (Karauli) भागात दोन दिवसांपुर्वी झालेल्या हिंसाचारात देवदूत बनून पोलिस अधिकाऱ्याने एका लहान मुलाचा जीव वाचवलाय. एकीकडे आगीचा भडका होत होता, अश्यात या आगीतून हा पोलीस लहान मुलाला आपल्या छातीशी कवटाळून त्याचा जीव वाचण्यासाठी प्रयत्न करत होता. नेत्रेश शर्मा (Netresh Sharma) असं या पोलीस कॉन्स्टेबलचं (Police Constable) नाव आहे. सोशल मीडियावर (Social Media Trending) शर्मा यांच्या कृतीचं तोंड भरून कौतुक होत आहे. एवढंच नव्हे तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांनीही शर्मा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांच्या कामाचं कौतुक केलं. शिवाय त्यांना बढतीही दिली.

नेमकं काय घडलं?

गुढीपाडव्याच्या दिवशी राजस्थानमधील करौलीमध्ये हिंसाचार उसळला. ठिकठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या आगीत अनेक घरं आणि दुकानं, वाहनं जाळली गेली. या घटनेवेळी कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा तिथे होते त्यांनी आगीशी दोन हात करून एका कुटुंबातील लहान मुलाचा जीव वाचवला. त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. त्यांच्या या कृती सर्वत्र कौतुक होतंय.

मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून कौतुक

कॉन्स्टेबल नेत्रश शर्मा यांच्या कामाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीनी शर्मा यांना फोन करून कौतुक केलं. “आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुमच्या कृतीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे”, असं गहलोत म्हणालेत. शिवाय शर्मा यांना बढती देऊन कॉन्स्टेबलरून हेड कॉन्स्टेबल पद दिलं.

ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव

ट्विटरवर शर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेकांनी त्यांचं कौतुक करत त्यांच्या कार्याला सलाम ठोकलाय. अंधाराततील प्रकाश आहात. कठीण काळातील खरे मदत करणारे आहात, असं म्हणत त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातंय. तर दुसऱ्याने मै खाकी हू म्हटलंय. हा सिनेमा नाही तर वास्तव आहे. तुमच्या कार्याला कडक सॅल्यूट असं आणखी एक नेटकरी म्हणाला आहे. तर काहींनी हा फोटो शेअर करत माणुसकी जिवंत असल्याचं म्हटलंय.

संबंधित बातम्या

Viral Video : आरश्याची कमाल! कुत्रा बनला स्वत:चाच दुश्मन, पाहा व्हीडिओ…

Viral Video : दोस्त असावा तर असा! गायींच्या गराड्यात श्वान बनला साथी, केलं चिमुकलीचं संरक्षण…

Viral Video : ‘चका चक’ गाण्यावरचा चिमुकलीचा व्हीडिओ व्हायरल, पाहून साराही म्हणेल, किती क्यूट…

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली