AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेमध्ये यापुढे दिसणार नाही ब्रिटिश काळाची ती खूण, रेल्वेमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

भारतीय रेल्वे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल करताना दिसत आहे. अशातच आता रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे तो निर्णय? जाणून घ्या सविस्तर

रेल्वेमध्ये यापुढे दिसणार नाही ब्रिटिश काळाची ती खूण, रेल्वेमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 10, 2026 | 4:26 PM
Share

भारतीय रेल्वेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. या बदलांचा भाग म्हणून आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गणवेशातही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी याबाबत मोठी घोषणा करत ब्रिटिश काळातील बंद गळ्याचा काळा कोट आता रेल्वेचा अधिकृत गणवेश राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

एका कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाल्या, ‘आपल्याला केवळ व्यवस्थेतूनच नाही तर आपल्या विचारसरणीतूनही गुलामीची मानसिकता काढून टाकावी लागेल. काम करण्याची पद्धत असो किंवा पोशाख. सर्व ठिकाणी ब्रिटिश काळातील जुन्या प्रथा दूर करणे गरजेचे आहे.’ त्यांनी सांगितले की, इंग्रजांनी सुरू केलेला बंद गळ्याचा काळा सूट आजपासून रेल्वेतील औपचारिक पोशाख म्हणून मान्य केला जाणार नाही.

हा निर्णय फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गणवेशापुरताच मर्यादित नसून सरकार मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या जुन्या प्रथा ओळखून त्या बदलण्याच्या दिशेने काम करत आहे. यामध्ये विद्यापीठांमधील समारंभांमध्ये वापरले जाणारे गाऊन आणि टोपी यांचाही समावेश आहे. तसेच शासकीय अधिकाऱ्यांना औपचारिक कार्यक्रमांमध्ये परिधान करावा लागणारा बंद गळ्याचा कोट बदलण्याचाही विचार सुरू आहे.

काही राज्यांमध्ये जिल्हाधिकारी, महापौर यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट प्रकारची वर्दी सक्तीची आहे. या नियमांचाही पुनर्विचार केला जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांचे स्पष्ट निर्देश

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ब्रिटिश काळातील जुन्या प्रथांची ओळख करून त्या ऐवजी भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणारे पर्याय सुचवण्याचे निर्देश दिले आहेत. दीक्षांत समारंभांमध्ये गाऊन आणि टोपी घालण्याची परंपरा अनेक ठिकाणी हळूहळू कमी होत असली तरी काही संस्थांमध्ये ती अजूनही सुरू आहे.

मात्र, भारतातील उष्ण आणि दमट हवामानात हा पोशाख अजिबात सोयीचा नसल्याचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या प्रथेवरही विरोध व्यक्त केला जात आहे.

वकिलांच्या पोशाखातही बदल होण्याची शक्यता

अधिकाऱ्यांच्या मते अशा अनेक प्रथा आहेत ज्या सामान्य जनतेच्या फारशा लक्षात येत नाहीत. मात्र त्या चर्चेद्वारे ओळखल्या जातात. सूत्रांनी अशीही शक्यता वर्तवली आहे की वकिलांनी परिधान करणारे काळे कोट आणि गाऊन यामध्येही बदल करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. ही परंपरा अ‍ॅडव्होकेट्स अ‍ॅक्ट 1961 अंतर्गत सुरू आहे. जी ब्रिटिश कायदेपद्धतीतून भारतात आली. त्या काळात हा पोशाख अधिकार, प्रतिष्ठा आणि न्यायप्रणालीप्रती बांधिलकीचे प्रतीक मानला जात होता.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत