AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सेल्फीच्या नादात युवक 70 फूट खाली दरीत कोसळला, पाहा पुढे काय झाले

राज्यात सर्वत्र चांगला पाऊस सुरु आहे. यामुळे वातावरण चांगले झाले आहे. डोंगर, दऱ्यांवर धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे अनेक जण वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. परंतु यावेळी केलेले अती धाडस अंगलट येऊ लागले आहे.

Video : सेल्फीच्या नादात युवक 70 फूट खाली दरीत कोसळला, पाहा पुढे काय झाले
| Updated on: Jul 24, 2023 | 12:49 PM
Share

लोणावळा | 24 जुलै 2023 : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सर्वत्र वातावणात चांगले झाले आहे. धबधबे प्रवाहित झाले आहेत. यामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. डोंगर, दऱ्यांवर पोहचलेले युवक, युवती सेल्फीसाठी नको ते धाडस करत आहेत. प्रसिद्ध अशा अजिंठा लेणीमध्ये असाच प्रकार युवकाला चांगलाच महागात पडला. यामुळे तो ७० फूट खाली दरीत पडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमके काय घडले

सोयगाव येथील गोपाळ पुंडलिक चव्हाण (३०) हा मित्रांसह अजिंठा लेणी पाहण्यासाठी आला. यावेळी सेल्फीसाठी तो सातकुंडाच्या धबधब्याजवळ गेला. धबधब्याच्या टोकला जाऊन पोहचला. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो ७० फूट खाली कोसळला. या घटनेनंतर लागलीच त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी धावाधाव सुरु केली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी धाव घेतली.

यामुळे तो वाचला

गोपाल चव्हाण वरतून खाली पाण्यात पडला. खाली पाणी असल्यामुळे तो वाचला. त्याला पोहता येत होते. दरम्यान अजिंठा लेणीवर असलेल्या भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी खाली दोर सोडला. मग तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर तो सुखरुप बाहेर आला.

व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दोरच्या साह्याने तो लटकलेला दिसत आहे. या घटनेनंतर पर्यंटकांनी सावधगिरी बाळगली गेली पाहिजे, अती धाडस करायला नको, अशा कॉमेंट व्यक्त केल्या जात आहेत. तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला गेला पाहिजे, अशी अपेक्षा सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. या ठिकाणी कठडे बसवावेत, अशी मागणी केली जात आहेत.

दरम्यान अजिंठा लेणी परिसरात यापूर्वी अशी घटना घडली होती. २०२१ रोजी जळगाव येथील देवांशू मौर्य या ठिकाणी पडला होता. त्यावेळी त्यालाही सुखरूप बाहेर काढले होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.