AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचा अंत जवळ आलाय? नोव्हेंबर 2026 मध्ये… भविष्यवाणी खरी ठरली तर सगळं काही संपणार?

World End Prediction : सोशल मीडियावर जगाचा अंत होणार असल्याचा दावा वेगाने व्हायरल होत आहे. हा मेसेज खरा आहे की खोटा याबाबतचे सत्य आता समोर आले आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जगाचा अंत जवळ आलाय? नोव्हेंबर 2026 मध्ये... भविष्यवाणी खरी ठरली तर सगळं काही संपणार?
World EndImage Credit source: Google
| Updated on: May 17, 2026 | 9:21 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जगाचा अंत होणार असल्याचा दावा वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या काही पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, वैज्ञानिकांनी अनेक वर्षांपूर्वीच 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होऊ शकतो, अशी भविष्यवाणी केली होती. या दाव्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता या जुन्या संशोधनाचा आणि वैज्ञानिक मॉडेलचा सखोल अभ्यास केल्यानंतर वेगळीच वस्तुस्थिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जगाचा अंत होणार हा दावा कसा सुरू झाला?

जगाचा अंत होणार असा व्हायरल होत असलेला दावा 1960 मध्ये करण्यात आलेल्या एका वैज्ञानिक संशोधनाशी संबंधित आहे. इलिनॉय विद्यापीठातील शास्त्रज्ञ हेन्झ वॉन फोरस्टर, पॅट्रीसिया मोरा आणि लॉरेन्स एमिओट यांनी त्या काळात जगातील वाढत्या लोकसंख्येवर संशोधन केले होते. त्यांनी सुमारे 2000 वर्षांच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा अभ्यास केला आणि जगाची लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले. या संशोधनात एक गणितीय मॉडेल तयार करण्यात आले होते. त्या मॉडेलनुसार जर लोकसंख्या अशीच वेगाने वाढत राहिली, तर 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

खरंच जगाचा अंत होणार होता का?

महत्त्वाची बाब म्हणजे वैज्ञानिकांनी कधीही असे म्हटले नव्हते की 2026 मध्ये पृथ्वी नष्ट होईल किंवा प्रलय येईल किंवा जगाचा अंत होईल. त्यांच्या संशोधनाचा उद्देश हा होता की, जर लोकसंख्या नियंत्रणाशिवाय वाढत राहिली, तर पृथ्वीवरील संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण होऊ शकतो. म्हणजेच अन्नटंचाई, गर्दी, पर्यावरणीय संकट आणि जीवनातील अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. त्या संशोधनात अनंत लोकसंख्या (Infinite Population) असा शब्दप्रयोग प्रतिकात्मक इशारा म्हणून वापरण्यात आला होता. ती जग संपण्याची तारीख नव्हती. त्यामुळे जगाचा अंत होणार नाही.

आता वैज्ञानिकांचे म्हणणे काय?

1960 च्या तुलनेत जग आता बदलले आहे. पृथ्वीवरील लोकसंख्या 8 अब्जांहून अधिक झाली आहे, मात्र लोकसंख्या वाढीचा वेग कमी होत चालला आहे. UN च्या अंदाजानुसार, जगाची लोकसंख्या 2080 च्या आसपास उच्चांक गाठू शकते आणि त्यानंतर हळूहळू घटू लागेल.

पृथ्वी मानवांसाठी कधी धोकादायक बनेल?

नवीन संशोधनानुसार, सुमारे 1 अब्ज वर्षांनंतर सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे महासागर कोरडे पडू शकतात आणि तापमान इतके वाढेल की जीवन शक्य राहणार नाही. मात्र हा दावा सध्याच्या परिस्थितीला अनुरूप आहे, मात्र आगामी काळात यात बदल होऊ शकतो.

सोशल मीडियावर हा विषय पुन्हा व्हायरल का?

समोर आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर अनेकदा जुन्या वैज्ञानिक संशोधनांची अपूर्ण किंवा चुकीची माहिती शेअर केली जाते. त्यामुळे 2026 संबंधीची ही जुनी लोकसंख्या थिअरी व्हायरल झाली आणि अनेकांचा हा जगाच्या अंताची भविष्यवाणी असल्याचा समज झाला. मात्र हे संशोधन वाढती लोकसंख्या आणि संसाधनांवरील ताण याबाबतचा इशारा होता.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.