AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचा अंत जवळ आलाय? नोव्हेंबर 2026 मध्ये… भविष्यवाणी खरी ठरली तर सगळं काही संपणार?

World End Prediction : सोशल मीडियावर जगाचा अंत होणार असल्याचा दावा वेगाने व्हायरल होत आहे. हा मेसेज खरा आहे की खोटा याबाबतचे सत्य आता समोर आले आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जगाचा अंत जवळ आलाय? नोव्हेंबर 2026 मध्ये... भविष्यवाणी खरी ठरली तर सगळं काही संपणार?
World EndImage Credit source: Google
| Updated on: May 17, 2026 | 9:21 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जगाचा अंत होणार असल्याचा दावा वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या काही पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, वैज्ञानिकांनी अनेक वर्षांपूर्वीच 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होऊ शकतो, अशी भविष्यवाणी केली होती. या दाव्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता या जुन्या संशोधनाचा आणि वैज्ञानिक मॉडेलचा सखोल अभ्यास केल्यानंतर वेगळीच वस्तुस्थिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जगाचा अंत होणार हा दावा कसा सुरू झाला?

जगाचा अंत होणार असा व्हायरल होत असलेला दावा 1960 मध्ये करण्यात आलेल्या एका वैज्ञानिक संशोधनाशी संबंधित आहे. इलिनॉय विद्यापीठातील शास्त्रज्ञ हेन्झ वॉन फोरस्टर, पॅट्रीसिया मोरा आणि लॉरेन्स एमिओट यांनी त्या काळात जगातील वाढत्या लोकसंख्येवर संशोधन केले होते. त्यांनी सुमारे 2000 वर्षांच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा अभ्यास केला आणि जगाची लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले. या संशोधनात एक गणितीय मॉडेल तयार करण्यात आले होते. त्या मॉडेलनुसार जर लोकसंख्या अशीच वेगाने वाढत राहिली, तर 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

खरंच जगाचा अंत होणार होता का?

महत्त्वाची बाब म्हणजे वैज्ञानिकांनी कधीही असे म्हटले नव्हते की 2026 मध्ये पृथ्वी नष्ट होईल किंवा प्रलय येईल किंवा जगाचा अंत होईल. त्यांच्या संशोधनाचा उद्देश हा होता की, जर लोकसंख्या नियंत्रणाशिवाय वाढत राहिली, तर पृथ्वीवरील संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण होऊ शकतो. म्हणजेच अन्नटंचाई, गर्दी, पर्यावरणीय संकट आणि जीवनातील अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. त्या संशोधनात अनंत लोकसंख्या (Infinite Population) असा शब्दप्रयोग प्रतिकात्मक इशारा म्हणून वापरण्यात आला होता. ती जग संपण्याची तारीख नव्हती. त्यामुळे जगाचा अंत होणार नाही.

आता वैज्ञानिकांचे म्हणणे काय?

1960 च्या तुलनेत जग आता बदलले आहे. पृथ्वीवरील लोकसंख्या 8 अब्जांहून अधिक झाली आहे, मात्र लोकसंख्या वाढीचा वेग कमी होत चालला आहे. UN च्या अंदाजानुसार, जगाची लोकसंख्या 2080 च्या आसपास उच्चांक गाठू शकते आणि त्यानंतर हळूहळू घटू लागेल.

पृथ्वी मानवांसाठी कधी धोकादायक बनेल?

नवीन संशोधनानुसार, सुमारे 1 अब्ज वर्षांनंतर सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे महासागर कोरडे पडू शकतात आणि तापमान इतके वाढेल की जीवन शक्य राहणार नाही. मात्र हा दावा सध्याच्या परिस्थितीला अनुरूप आहे, मात्र आगामी काळात यात बदल होऊ शकतो.

सोशल मीडियावर हा विषय पुन्हा व्हायरल का?

समोर आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर अनेकदा जुन्या वैज्ञानिक संशोधनांची अपूर्ण किंवा चुकीची माहिती शेअर केली जाते. त्यामुळे 2026 संबंधीची ही जुनी लोकसंख्या थिअरी व्हायरल झाली आणि अनेकांचा हा जगाच्या अंताची भविष्यवाणी असल्याचा समज झाला. मात्र हे संशोधन वाढती लोकसंख्या आणि संसाधनांवरील ताण याबाबतचा इशारा होता.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन