AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात महागडे नाणे, किंमत तब्बल 192 कोटी रुपये, पाहा कोणासाठी तयार झाले

स्काय न्यूजने दिलेल्या बातमीनूसार या नाण्याचा आकार बास्केट बॉलच्या आकाराचा आहे. या नाण्याचा व्यास 9.6 इंच इतका आहे.

जगातील सर्वात महागडे नाणे, किंमत तब्बल 192 कोटी रुपये, पाहा कोणासाठी तयार झाले
the crown coin Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 09, 2023 | 3:47 PM
Share

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : ईस्ट इंडीया कंपनीने क्वीन एलीझाबेथ – || पहिल्या पुण्यतिथी निमित्त एक नाणं जारी करण्यात आले आहे. त्याची किंमतच 192 कोटी रुपये आहे. या नाण्याची निर्मिती 4 किलोग्रॅम सोन्यापासून बनविले आहे. यात सुमारे 6 हजार 400 हीरे जडविलेले आहेत. या बेसबॉलच्या आकाराच्या या नाण्याचे नाव ‘द क्राऊन कॉईन’ असे ठेवण्यात आले असून आतापर्यंतचे ते सर्वात महागडं नाणं म्हटलं जात आहे. आतापर्यंत डबल ईगल या नावाच्या नाण्याला जगातले सर्वात महागडे नाणं मानलं जात होते. या डबल इगलची किंमत 163 कोटी रुपये होती. या नाण्याचे डीझाईन ऑगस्टस सेंट गॉडंस यांनी 1933 मध्ये केली होती.

स्काय न्यूजने दिलेल्या बातमीनूसार या नाण्याचा आकार बास्केट बॉलच्या आकाराचा आहे. या नाण्याचा व्यास 9.6 इंच इतका आहे. या नाण्यावर दिवंगत सम्राटाचं छायाचित्रेही आहेत. प्रसिद्ध चित्रकार मॅरी गिलिक, अर्नोल्ड माचिन, राफेल मॅकलॉफ आणि इयान रॅंक-ब्रॉडली यांनी ही चित्रे काढली आहेत. या नाण्याला तयार करण्यासाठी भारत, जर्मनी, युके, श्रीलंका आणि सिंगापूरच्या कलाकारांनी हातभार लावला आहे. या नाण्याला ईस्ट इंडीया कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ संजीव मेहता यांनी जारी केले आहे.

क्वीन एलिझाबेथ

8 सप्टेंबर 2022 रोजी इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथ हीचे निधन झाले. एक वर्षांनंतर ईस्ट इंडीया कंपनीने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हे नाणं तयार केले आहे. या नाण्याच्या कडे क्वीन एलिझाबेथ यांची प्रसिद्ध वाक्यं कोरण्यात आली आहेत. 24 ऑगस्ट 1608 मध्ये ईस्ट इंडीया कंपनीचे पहिले जहाज सुरतच्या किनाऱ्याला लागले होते. यास ईस्ट इंडीया कंपनीचे आगमन मानले जाते. व्यापारासाठी आलेले इंग्रज नंतर 200 वर्षे भारतावर राज्य करतील याची कल्पनाही कोणाला आली नव्हती. या घटनेने भारताचा भुगोल आणि इतिहास दोन्हींना बदलून टाकले.

ईस्ट इंडीया कंपनीची स्थापना

16 व्या शतकात इंग्रजांना व्यापारासाठी मोठ्या बाजाराची गरज होती. तेव्हा व्यापाऱ्यांनी भारत व्यापार करण्याची परवानगी मागितली. त्यांनी 1600 मध्ये या कंपनीची स्थापना केली. त्यांना साऊथ आणि साऊथ ईस्ट आशियात व्यापार करायचा होता. म्हणून कंपनीचे नाव ईस्ट इंडीया ठेवले. 125 भागधारक आणि 72 हजार स्टर्लिंग पाऊंड भांडवलातून कंपनी तयार झाली. या कंपनीला ब्रिटनच्या शाही परिवाराचे संरक्षण होते.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.