AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5G in India : देशातील 50 शहरात 5G चा गिअर पडला, राज्यातील या तीनच शहरात सेवा, पण इतकी गावे इंटरनेटच्या रेंज बाहेर..

5G in India : राज्यातील या शहरात 5G चा गिअर पडला आहे..

5G in India : देशातील 50 शहरात 5G चा गिअर पडला, राज्यातील या तीनच शहरात सेवा, पण इतकी गावे इंटरनेटच्या रेंज बाहेर..
याच शहरात सेवाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 14, 2022 | 10:28 PM
Share

नवी दिल्ली : भारतात 1 ऑक्टोबर 2022 रोजी 5G नेटवर्कचा (5G Network) श्रीगणेशा झाला. ही सेवा आता देशातील प्रमुख शहरात (Major Cities) उपलब्ध झाली आहे. 5G नेटवर्कचा सर्वात जास्त विस्तार गुजरात (Gujrat) राज्यात झाला आहे. या राज्यातील जवळपास 33 जिल्ह्यांमध्ये हा सेवा मिळत आहे. इतर राज्य त्यामानाने मागे आहेत. महाराष्ट्रातील तर अवघ्या तीनच शहरात 5G नेटवर्कची सेवा मिळत आहे. येत्या काही दिवसात टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) लवकरच त्यांचं जाळ विस्तारतील अशी आशा आहे.

राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरातच 5G नेटवर्कचे उद्धघाटन झाले आहे. या शहराच्या परिघाबाहेर उर्वरीत राज्यात 5G नेटवर्क नाही. तर गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, भावनगर, मेहसाणा, राजकोट, सूरत, वडोदरा, अमरेली, बोटाद, जूनागढ, पोरबंदर, वेरावल, आनंद, भरुच, पालनपूर, नवसारी अशा एकूण 33 जिल्ह्यात ही सेवा उपलब्ध आहे.

बुधवारी दूरसंचार राज्य मंत्री देवुसिंह चौहान (Devusinh Chauhan) यांनी संसदेत याविषयीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई, चेन्नई, बेंगळुरु या सारख्या शहरात 5G नेटवर्कची सुरुवात झाली आहे. सध्या देशातील 14 राज्ये आणि केंद्री शासित प्रदेशात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे.

उत्तर भारतातील राज्यातील एखाद-दोन शहर वगळता ही सेवा अद्याप कुठेच पोहचलेली नाही. त्यामुळे एकट्या गुजरात राज्यातच 5G नेटवर्कचा कसा विस्तार झाला हे मोठं कोड आहे. त्यासाठी त्या राज्याने काय पायाभूत सुविधा पुरविल्या हा संशोधनाचा विषय आहे.

दूरसंचार ऑपरेटर्सने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2022 पर्यंत देशातील 6,44,131 गावांतील जवळपास 6,05,230 गावांमध्ये मोबाईलची कनेक्टिविटी आहे. तर 38,901 गावांच्या हद्दीत अद्याप इंटरनेटचे नेटवर्क पोहचलेले नाही.

आदिवासी विभागात अद्यापही मोबाईल नेटवर्क अथवा इंटरनेट पोहचलेले नाही. 25 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या 1,20,613 गावांतील जवळपास 1,00,030 गावात मोबाईल नेटवर्क आहे. तर 20,583 गावांमध्ये नेटवर्कची रेंज नाही.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.