AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan : कर्ज थकल्यास बँक नाही लावू शकत तगादा, कर्जदाराला मिळाले आता हे अधिकार..

Loan : कर्ज थकल्यास आता बँकेला नाही करता येणार जबरदस्ती, काय आहेत तुमचे अधिकार..जाणून तर घ्या..

Loan : कर्ज थकल्यास बँक नाही लावू शकत तगादा, कर्जदाराला मिळाले आता हे अधिकार..
वसुलीसाठी नाही देता येणार त्रासImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 05, 2022 | 8:47 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्हीही बँकेकडून (Bank) एखादे कर्ज (Loan) घेतले असेल आणि त्याचे हप्ते चुकविताना नाकेनऊ येत असतील तर ? घाबरु नका. बँकेचे वसुली अधिकारी (Recovery Officer) तुम्हाला नाहक त्रास देतील अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण आता ग्राहकांना ही काही अधिकार देण्यात आले आहे. काय आहेत हे अधिकार, जाणून घेऊयात..

अनेक जण वाहन कर्ज (Car Loan), शैक्षणिक कर्ज (Education Loan) लग्न अथवा व्यावसायिक कर्ज (Business Loan), गृह कर्ज (Home Loan) घेतात. बँकाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्सचा भडिमार करतात.

कर्ज फेडणे हे तुमच्यासाठी फायदेशीरच असते. कारण त्यामुळे पुढे आर्थिक चणचण जाणवली की तुम्हाला लवकर कर्ज मिळते. पण अनेकदा काही आर्थिक अडचणींमुळे कर्ज वेळेत फेडल्या जात नाही.

अशावेळी बँका ग्राहकाला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सातत्याने आठवण करुन देतात. ग्राहकांना कॉल, एसएमएस, ई-मेल पाठवितात. बँका एखाद्यावेळी हप्ता चुकला तर कानाडोळा करतात. पण जर तुम्ही हप्ताचे भरले नाहीतर मग अडचण येते.

अनेक दिवसांपासून कर्ज थकले असेल तर बँका रिमाईंडर नोटीस न पाठविता, घरी थेट रिकव्हरी एजंट, म्हणजे वसुली पंटर पाठवितात. त्यांच्यामार्फत बँका धमकवतात. घरातील सदस्यांसमोर अपमानकारक बोलतात.

आतापर्यंत याप्रकरणात बँकांना अनेक अधिकार होते. रिकव्हरी एजंटच्या माध्यमातून बँका ग्राहकांना दहशतीखाली ठेवत होत्या. ग्राहकांना घर विक्री अथवा दाग-दागिने विक्री करायला भाग पाडतात.

पण आता ग्राहकांनाही काही अधिकार देण्यात आले आहे. ग्राहक आता या वसुली प्रकराविरुद्ध पोलिसांकडे दाद मागू शकतात. एवढेच नाही तर नुकसान भरपाई ही त्यांना मागता येते.

बँकांना कर्जाची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी त्यांना RBI च्या नियमांचे पालन मात्र करावे लागते. बँकेचा रिकव्हरी एजंट कर्ज बुडव्याच्या घरी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वाजेदरम्यानच कॉल करु शकतात.

ग्राहकाच्या घरी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वाजेदरम्यानच त्यांना घरी येऊन कर्ज वसुली मागता येईल. त्यानंतर वसुली एजंट आल्यास मात्र ग्राहकाला तक्रार दाखल करता येते.

ग्राहकाने 90 दिवसांच्या आत हप्ते जमा केले नाही तर बँक ग्राहकाला नोटीस पाठविते. त्यानंतर पुढील 60 दिवसांचा कालावधी देण्यात येतो. ही मुदत संपल्यास बँक पुढील कारवाई करण्यास मोकळी असते.

जर ग्राहकांनी कर्जाची परतफेड केली नाही तर बँक वाहन, घर अथवा तारण ठेवलेली वस्तू, संपत्ती, मालमत्ता विक्री करुन कर्ज वसुली करु शकते. पण हे करताना बँकांना नियमांचे पालन करावे लागते.

रिकव्हरी एजंटने कर्ज वसुली करताना अपमान केल्यास, आपत्तीजनक शब्दांचा वापर केल्यास, मारहाण केल्यास त्याविरोधात ग्राहकाला पोलिसांमध्ये आणि बँकेकडे तक्रार करता येते.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.