AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan : कर्ज थकल्यास बँक नाही लावू शकत तगादा, कर्जदाराला मिळाले आता हे अधिकार..

Loan : कर्ज थकल्यास आता बँकेला नाही करता येणार जबरदस्ती, काय आहेत तुमचे अधिकार..जाणून तर घ्या..

Loan : कर्ज थकल्यास बँक नाही लावू शकत तगादा, कर्जदाराला मिळाले आता हे अधिकार..
वसुलीसाठी नाही देता येणार त्रासImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 05, 2022 | 8:47 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्हीही बँकेकडून (Bank) एखादे कर्ज (Loan) घेतले असेल आणि त्याचे हप्ते चुकविताना नाकेनऊ येत असतील तर ? घाबरु नका. बँकेचे वसुली अधिकारी (Recovery Officer) तुम्हाला नाहक त्रास देतील अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण आता ग्राहकांना ही काही अधिकार देण्यात आले आहे. काय आहेत हे अधिकार, जाणून घेऊयात..

अनेक जण वाहन कर्ज (Car Loan), शैक्षणिक कर्ज (Education Loan) लग्न अथवा व्यावसायिक कर्ज (Business Loan), गृह कर्ज (Home Loan) घेतात. बँकाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्सचा भडिमार करतात.

कर्ज फेडणे हे तुमच्यासाठी फायदेशीरच असते. कारण त्यामुळे पुढे आर्थिक चणचण जाणवली की तुम्हाला लवकर कर्ज मिळते. पण अनेकदा काही आर्थिक अडचणींमुळे कर्ज वेळेत फेडल्या जात नाही.

अशावेळी बँका ग्राहकाला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सातत्याने आठवण करुन देतात. ग्राहकांना कॉल, एसएमएस, ई-मेल पाठवितात. बँका एखाद्यावेळी हप्ता चुकला तर कानाडोळा करतात. पण जर तुम्ही हप्ताचे भरले नाहीतर मग अडचण येते.

अनेक दिवसांपासून कर्ज थकले असेल तर बँका रिमाईंडर नोटीस न पाठविता, घरी थेट रिकव्हरी एजंट, म्हणजे वसुली पंटर पाठवितात. त्यांच्यामार्फत बँका धमकवतात. घरातील सदस्यांसमोर अपमानकारक बोलतात.

आतापर्यंत याप्रकरणात बँकांना अनेक अधिकार होते. रिकव्हरी एजंटच्या माध्यमातून बँका ग्राहकांना दहशतीखाली ठेवत होत्या. ग्राहकांना घर विक्री अथवा दाग-दागिने विक्री करायला भाग पाडतात.

पण आता ग्राहकांनाही काही अधिकार देण्यात आले आहे. ग्राहक आता या वसुली प्रकराविरुद्ध पोलिसांकडे दाद मागू शकतात. एवढेच नाही तर नुकसान भरपाई ही त्यांना मागता येते.

बँकांना कर्जाची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी त्यांना RBI च्या नियमांचे पालन मात्र करावे लागते. बँकेचा रिकव्हरी एजंट कर्ज बुडव्याच्या घरी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वाजेदरम्यानच कॉल करु शकतात.

ग्राहकाच्या घरी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वाजेदरम्यानच त्यांना घरी येऊन कर्ज वसुली मागता येईल. त्यानंतर वसुली एजंट आल्यास मात्र ग्राहकाला तक्रार दाखल करता येते.

ग्राहकाने 90 दिवसांच्या आत हप्ते जमा केले नाही तर बँक ग्राहकाला नोटीस पाठविते. त्यानंतर पुढील 60 दिवसांचा कालावधी देण्यात येतो. ही मुदत संपल्यास बँक पुढील कारवाई करण्यास मोकळी असते.

जर ग्राहकांनी कर्जाची परतफेड केली नाही तर बँक वाहन, घर अथवा तारण ठेवलेली वस्तू, संपत्ती, मालमत्ता विक्री करुन कर्ज वसुली करु शकते. पण हे करताना बँकांना नियमांचे पालन करावे लागते.

रिकव्हरी एजंटने कर्ज वसुली करताना अपमान केल्यास, आपत्तीजनक शब्दांचा वापर केल्यास, मारहाण केल्यास त्याविरोधात ग्राहकाला पोलिसांमध्ये आणि बँकेकडे तक्रार करता येते.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.