AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insurance : मोठी बातमी! आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारचा धडाकेबाज निर्णय

Insurance : आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा भारतातील नागरिकांना होणार आहे. आयुष्यमान कार्ड योजनेमुळे अनेकांचे आयुष्यमान वाढणार आहे. काय घेतलाय सरकारने निर्णय..

Insurance : मोठी बातमी! आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारचा धडाकेबाज निर्णय
| Updated on: Jun 14, 2023 | 8:18 PM
Share

नवी दिल्ली : आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा भारतातील नागरिकांना होणार आहे. आयुष्यमान कार्ड योजनेमुळे (Ayushman Bharat Yojana) अनेकांचे आयुष्यमान वाढणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला (IRDAI) याविषयीचे निर्देश दिले आहेत. आयुष्यमान भारत योजनेमुळे भारतातील मोठ्या वर्गाला आरोग्य सोयी-सुविधा मिळाल्या आहेत. त्यांना 5 लाखांपर्यंतच्या आरोग्य विम्यात मोठी ऑपरेशन पण होत असल्याने गरिबांच्या खिशावरील भार हलका झाला आहे.

विमा कंपन्यांना दिले हे निर्देश भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कंपन्यांना आयुष्यमान योजनेविषयी मोठी अपडेट दिली आहे. नवीन विमाधारकांना आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) ID अंतर्गत आयुष्यमान कार्ड तयार करण्यात येणार आहे. या युनिक आयडीमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित सर्व माहिती सहज उपलब्ध होईल आणि त्याचा लाभ घेऊन त्यांना उपचार घेता येईल.

हेल्थ डेटा जतन या आयडीमुळे नागरिकांची आरोग्यविषयीची माहिती जतन राहिल. या माहितीच्या आधारे रुग्णालय आणि डॉक्टरांना रोगाची, उपचाराची पार्श्वभूमीवर माहिती उपलब्ध होईल. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची विमाधारकाला निवड करता येईल. रुग्णालयात उपचारासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत कार्डधारकाचा मोठा वेळ वाचेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण(NHA) ही योजना राबवत असून आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा हा एक भाग आहे.

सर्व भारतीयांना मिळणार सुविधा आतापर्यंत 402.6 दशलक्ष ABHA आईडी तयार करण्यात आल्या आहेत. वर्ष 2022 पासून भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन संयुक्तपणे हा उपक्रम राबवित असून देशातील प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आयडी देण्याची तयारी आहे. विमा दाव्यांचा जलद निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

विमा घेतानाच अर्ज आता विमा कंपन्यांना नवीन विमा काढताना सर्व विमाधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा अर्ज भरुन घ्यावा लागणार आहे. हा अर्ज विमाधारकाला भरावा लागेल. त्याच्याकडून आरोग्याविषयक माहिती आरोग्य सेवा प्राधिकरणासोबत शेअर करण्याची परवानगी घेण्यात येईल. त्याची परवानगी घेतल्यानंतर या ऑनलाईन अर्जानंतर विमाधारकाला आयुष्यमान भारत आयडी देण्यात येईल.

डिजी लॉकरचा उपयोग आरोग्य योजनांरचा ही ते लाभ घेऊ शकता. डिजीलॉकरचा (Digilocker) उपयोग करुन त्याठिकाणी तुम्हाला दस्तावेज जतन करुन ठेवता येतील. आरोग्य मंत्रालयानुसार, डिजीलॉकरच्या वापरकर्त्यांना आता आरोग्य रेकॉर्ड डिजिटल रुपात सुरक्षित ठेवता येणार आहे. ते आयुष्यमान भारत आरोग्य खाते (ABHA) डिजीलॉकरला जोडू शकतात. डिजीलॉकर मुळे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन(ABDM) सोबतच इतर कागदपत्रेही जोडता येतात. शी जोडलेल्या सदस्यांचा हेल्थ रेकॉर्ड डिजिटल रुपात सुरक्षित करण्यात येणार आहे.

Follow Us
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना,
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना, 1 ऑगस्टला... असं काय घडलं?
तुमची दाढी अजून जळतेय...; शिंदेंच्या टीकेला राऊतांचा जोरदार पलटवार
Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय...मिस्टर मिंदे...; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'त्या' फोटोची तुफान चर्चा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा