AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीसाठी केंद्र सरकारचा नवा फॉर्म्युला; वेतन आयोग बंद होणार?

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येते. मात्र लवकरच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीसाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात येण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीसाठी केंद्र सरकारचा नवा फॉर्म्युला; वेतन आयोग बंद होणार?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: twitter
| Updated on: Jun 10, 2022 | 2:13 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारी कर्मचारी (Central Government Employees) वेतन वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येते. (7th Pay Commission) तसेच वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात देखील वाढ करण्यात येते. परंतु आता केंद्र सरकार इथून पुढे वेतन वाढीसाठी कोणताही नवा आयोग (New (Pay Commission) लागू करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. आता नवा वेतन आयोग लागू होणार नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढवला जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पगार वाढवण्यासाठी केंद्र सरकार एखादे नव सूत्र आमलात आणण्याची शक्यता आहे. कामगिरीच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

असा असेल नवा फॉर्म्युला

मिळत असलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी असा एक फॉर्म्यूला तयार करत आहे. की त्या फॉर्म्युल्यानुसार एका ठरावीक कालवधीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात आपोआप वाढ होईल. ही पगार वाढ कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून असण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारच्या अंडरमध्ये एकूण 68 लाख कर्मचारी काम करतात तर पेंशनधारकांचा आकडा देखील मोठा आहे. सध्या स्थितीमध्ये एकूण 52 लाख पेंशनधारक आहेत.

कनिष्ठ कर्मचाऱ्यांना होणार फायदा

केंद्र सरकारने वेतनवाढीचा नवा फॉर्म्यूला लागू केल्यास जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. सर्वच प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन 21 हजारांवर पोहोचेल. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच प्रकारचे लाभ मिळाले पाहिजे यावर सध्या सरकार आपले लक्ष केंद्रीत करत आहे. याचाच एक भाग म्हणून आता पगारवाढीसाठी वेतन आयोग न आणता नवा फॉर्म्युला विकसीत करण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरू आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.