AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Inflation | महागाईची खिचडी शिजणार ! सणासुदीत या पदार्थाची किंमत वाढणार

Inflation | महागाईचे आकडे दिवसागणिक वाढत आहेत. महागाईचे चटके आपल्या सर्वांनाच सहन करावे लागत आहेत. सणासुदीत आणखी एक पदार्थ महाग होणार आहे..

Inflation | महागाईची खिचडी शिजणार ! सणासुदीत या पदार्थाची किंमत वाढणार
जेवणावरुन झालेल्या वादातून हॉटेल मालकाकडून ग्राहकावर हल्लाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 18, 2022 | 5:55 PM
Share

नवी दिल्ली : भारतातील काही राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातलं आहे. तर काही ठिकाणी पावसाने डोळे वटारले आहेत. त्यामुळे खरीपाचं पिक (Kharif Crop) हातचं गेले आहे. जे पीक आहे, त्याचं उत्पादन (Production) कमी होणार आहे. त्याचा परिणाम किंमतीवर होणार आहे.

देशातील किरकोळ महागाई ऑगस्ट महिन्यात 7 टक्क्यांवर पोहचली आहे. अर्थव्यवस्था झपाट्याने विकसीत देशांच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकत आहे. भारताची अर्थव्यवस्था 5 व्या स्थानी झेपावली आहे. तर महागाई तिच्या सर्वोच्च पातळीवर आहे.

मंदीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर अजूनही ठळकपणे दिसून आलेला नाही. सणासुदीच्या दिवसात महागाई पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा सणाच्या आनंदावर विरजण पडू शकते.

यंदा तांदळाचे उत्पादन घटणार आहे. थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 60-70 लाख टन तांदळाचे उत्पादन घसरणार आहे. उत्पादनातील ही मोठी घसरण सर्वसामान्य माणसाला फटका देणारी ठरणार आहे.

नवीन धान आणि गव्हाचे पीक कमी येणार असल्याने किंमती भडकतील. ऐन सणासुदीत हा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. सरकारने तांदळाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावला आहे. त्याचा परिणाम दिसून येईल, तरी किंमती वाढण्याची भीती आहे.

गेल्या काही महिन्यांत सर्वच खाद्यान्न आणि रोजच्या वापरातील पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. किरकोळ महागाई दर पुन्हा चढा आहे.

तज्ज्ञांच्या मते, महागाई काही दिवस उच्चस्तरावरच राहिल. महागाईपासून जनतेची सूटका होणार नाही. त्यातच धानाचं उत्पादन घसरल्याने येत्या काही दिवसात चिंता वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.

भारतात तांदळाचे उत्पादन वर्ष 2021-22 मध्ये 13.029 कोटी टन झाले होते. त्याअगोदर हा आकडा 12.437 कोटी टन होता. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, यंदा हे उत्पादन 60-70 लाख टनांनी घसरेल.

खरीपचं हातचा गेल्याने चिंता वाढली आहे. तांदळाच्या एकूण उत्पादनात खरीपाचा वाटा तब्बल 85 टक्के इतका आहे. यावरुन नुकसानीचा अंदाज बांधता येतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.