AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 15.66 लाखांचा परतावा, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन तरुण प्लॅनबद्दल

अनेक जण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची गरज लक्षात घेऊन गुंतवणूक करतात. त्यामुळे ते नेहमी अशा प्लॅनच्या शोधात असतात की ज्या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैसा कामाला येईल. पालकांची ही गरज एलआयसीचा (LIC) जीवन तरुण प्लॅन (LIC Jeevan Tarun Plan) पूर्ण करू शकतो.

अवघ्या 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 15.66 लाखांचा परतावा, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन तरुण प्लॅनबद्दल
एलआयसी (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: Tv9
| Updated on: Apr 09, 2022 | 10:57 AM
Share

आजच्या काळात शिक्षण (Education) आणि आरोग्यावरील खर्च वाढला आहे. मुलांच्या गरजा पू्र्ण करताना आर्थिक बजेट कोलमडत आहे. मुलं जसजशी मोठी होत जातात, तसतसा त्यांचा खर्च देखील वाढत जातो. हेच लक्षात घेऊन सध्या अनेक पालकांकडून आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. अनेक जण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची गरज लक्षात घेऊन गुंतवणूक करतात. त्यामुळे ते नेहमी अशा प्लॅनच्या शोधात असतात की ज्या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैसा कामाला येईल. पालकांची ही गरज एलआयसीचा (LIC) जीवन तरुण प्लॅन (LIC Jeevan Tarun Plan) पूर्ण करू शकतो. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार केली आहे. एलआयसीचा जीवन तरुण प्लॅन हा एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक जीवन विमा बचत योजना आहे. जेव्हा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला या प्लॅनमधून विम्याचे संरक्षण आणि एक चांगला परतावा अशा दोनही गोष्टींचा लाभ होतो.

पॉलिसीचा कालावधी

ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्ही ज्या मुलाची अथवा मुलीची पॉलिसी काढणार आहात, तिचे वय 90 दिवस पूर्ण झालेले असावे. या पॉलिसीचा कालावधी जास्तीत जास्त बारा वर्षांचा आहे. त्यामुळे तुमच्या घरात जर बारा वर्षांच्या आतील मुलं असतील तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. एलआयसीची ही योजना मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमचा मुलगा एक वर्षांचा होण्याच्या आत गुंतवणुकीला सुरुवात केली तर तो 25 वर्षांचा झाल्यानंतर चांगला परतावा मिळतो. उदा. जर तुमच्या मुलाचे वय एक वर्ष आहे, आणि तुम्ही जर आतापासून त्याच्या नावावर महिन्याला तीन हजार म्हणजे दिवसाला 100 रुपयांची गुंतवणूक या योजनेंतर्गंत केल्यास तुम्हाला कालावधी पूर्ण झाल्यानंतर 15.66 लाखांचा परतावा मिळतो. या योजनेचा कालावधी 25 व्या वर्षी पूर्ण होतो. मात्र तुम्हाला केवळ 20 वर्षच पैसे भरावे लागतात.

प्रीमियम भरण्याचे मार्ग

तुम्ही जर एलआयसीच्या जीवन तरुण प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दर महिन्याला हप्त्याचा भरणा करू शकता. तुमच्या पगारामधून हप्ता आपोआप कट होईल. तुम्ही दर तीन महिन्याला देखील हप्ता भरू शकता, दर सहा महिन्यांनी किंवा एकदाच वनटाईम पेमेंट करण्याची सुविधा देखील या योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलाच्या सुरक्षीत भविष्यासाठी हा प्लॅन उपयोगी असून, सध्या या प्लॅनमधील गुंतवणूक वाढत आहे.

संबंधित बातम्या

Reserve Bank of India : सामनाच्या अग्रलेखातून रिझर्व्ह बॅंकेवरती टीका, निवडणुकांमुळे इंधन दरवाढ कशी रोखून ठेवली

Russia-Ukraine war : भारतातून गहू, साखरेची निर्यात वाढली, भावात तेजीचे संकेत

Petrol-Diesel Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सलग तीसऱ्या दिवसी इंधनाचे दर स्थिर

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.