AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर त्या शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार दहा लाखांपर्यंतचं कर्ज

राज्यात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने गायींच्या पालनपोषणावर भर दिला आहे. त्याला चालना देण्यासाठी एक उत्कृष्ट योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे.

...तर त्या शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार दहा लाखांपर्यंतचं कर्ज
farmerImage Credit source: tv9 marathi
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Mar 09, 2025 | 6:48 PM
Share

राज्यात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने गायींच्या पालनपोषणावर भर दिला आहे. त्याला चालना देण्यासाठी एक उत्कृष्ट योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत योगी सरकार राज्यातील 10 गायींचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे.

जर आपण देशातील लहान आणि बॉर्डरवरील शेतकऱ्यांबद्दल बोललो तर, शेतीव्यतिरिक्त ते आपल्या उदरनिर्वाहासाठी पशुपालनावर अवलंबून आहेत. कमी जागेमुळे त्यांना शेतीतून फारसा नफा मिळत नाही, त्यामुळे त्यांना पशुपालन करावे लागते. तसेच केंद्र आणि राज्य सरकारही पशुपालनाला प्रोत्साहन देत आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे हे देखील त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. शेणाचा वापर सेंद्रिय खत बनवण्यासाठी केले जाते. जर शेतकऱ्यांनी पशुपालन केले तर ते शेण फेकून देण्याऐवजी त्याचा वापर खत बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. या संदर्भात, उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अतिशय फायदेशीर योजना काढली आहे. ही योजना काय आहे हे चला जाणून घेऊयात.

सरकार १० लाख रुपयांचे कर्ज देणार

उत्तर प्रदेश सरकारने राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये, गायींच्या पालनपोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्ट योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, योगी सरकार राज्यात १० गायी पाळणाऱ्या शेतकऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. हे कर्ज शेतकऱ्यांना अमृत धारा योजनेअंतर्गत दिले जाईल. विशेष म्हणजे हे कर्ज अतिशय सोप्या अटींवर दिले जाईल. एवढेच नाही तर ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही जामीनदाराची आवश्यकता लागणार नाही.

दोन हजार कोटींची तरतूद

नुकतेच उत्तर प्रदेश सरकारने अर्थसंकल्प सादर केला होता ज्यामध्ये या योजनेसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना गायी पाळण्यासाठी प्रोत्साहित करेल. मोठ्या प्रमाणात गायी शहर किंवा खेडेगावात फिरताना दिसतात. अनेकवेळा रस्त्यावर अपघातही होतात या योजनेमुळे गायींना सुरक्षित वातावरण मिळेल.

नैसर्गिक शेतीला चालना मिळेल

गायींना अन्न आणि पाण्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक वेळा लोक त्यांच्याशी गैरवर्तनही करतात. या समस्येचा विचार करून, उत्तर प्रदेश सरकारने गोरक्षणासाठी अनेक गोशाळा उघडल्या आहेत. त्यांच्या देखभालीसाठी सरकारने १००१ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूदही केली आहे. सरकारला या सर्व गोशाळांना स्वावलंबी बनवायचे आहे. एवढेच नाही तर गोशाळेतील शेण आणि गोमूत्र आर्थिकदृष्ट्या उपयुक्त बनवण्याचे काम देखील करतील सरकार करेल. यासाठी सरकारकडून एक वेगळा कौशल्य विकास कार्यक्रम चालवला जाणार आहे.

अमृत धारा योजना म्हणजे नक्की काय?

उत्तर प्रदेश सरकारने गायींचे पालनपोषण आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी “अमृत धारा योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत:

दोन ते दहा गायी पाळण्यासाठी सरकार १० बँकांच्या माध्यमातून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे.

३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही जामीनदाराची गरज भासणार नाही.

या योजनेअंतर्गत, पशुपालकांना आर्थिक मदत तसेच तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल.

या उपक्रमाचा उद्देश भटक्या प्राण्यांचे संरक्षण करणे तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आहे जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात रासायनिक खते आणि कीटकनाशकांवर अवलंबून राहावे लागणार नाही यासाठी आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन