AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Card : निष्क्रिय झाले पॅनकार्ड, आता नाही करता येणार हे आर्थिक व्यवहार

Pan Card : पॅन-आधार जोडणी न करण्याचे परिणाम अनेकांना भोवणार आहेत. त्यांना अनेक आर्थिक व्यवहारच नाही तर या सेवांपासून वंचित रहावे लागेल. त्यांना निष्क्रियतेचा मोठा फटका बसेल.

Pan Card : निष्क्रिय झाले पॅनकार्ड, आता नाही करता येणार हे आर्थिक व्यवहार
| Updated on: Jul 07, 2023 | 5:35 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा संधी दिली. दोन्ही कार्डच्या लिंकिंगसाठी आयकर खात्याने (Income Tax) 1 जुलै 2017 रोजी नियम लागू केला होता. पण त्यानंतर अनेकदा ही मुदत वाढविण्यात आली. गेल्यावर्षीपासून दोन्ही कार्ड जोडणीसाठी केंद्र सरकारने विलंब शुल्क आकारले. अर्थसंकल्प 2021 मध्ये केंद्र सरकारने हे दोन्ही कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आले होते. आता 30 जून 2023 रोजीपर्यंत कार्डची जोडणी करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. ज्यांनी ही जोडणी (PAN-Aadhaar Not Link) केली नाही, त्याचे परिणाम अनेकांना भोवतील. त्यांना अनेक आर्थिक व्यवहारच नाही तर या सेवांपासून वंचित रहावे लागेल. त्यांना निष्क्रियतेचा मोठा फटका बसेल.

दंड वसुली 1 एप्रिल 2022 आणि जून 2022 या दरम्यान आधार लिंक केल्यावर 500 रुपये दंड लावण्यात आला. तर गेल्या वर्षी 1 जुलै 2022 पासून आधार-पॅन जोडणीसाठी 1,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. त्यानंतर ही अनेकांनी दोन्ही कार्डची जोडणी केली नाही.

पॅनकार्डचा उपयोग केंद्र सरकारने कर चोरी शोधण्यासाठी पॅनकार्ड सुरु केले. करदात्यांची गुंतवणूक, कर्ज आणि इतर व्यावसायिक घटनांचा रेकॉर्ड त्यामुळे सरकार दरबारी नोंदवल्या जातो. त्यासाठी पॅनकार्ड क्रमांकाचा उपयोग होतो. अनेक आर्थिक बाबींचा ट्रॅक रेकॉर्डसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. देशात विना पॅन कार्ड मोठा व्यवहार करता येत नाही.

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास असा बसतो फटका

  1. आयकर विभागानुसार, 15 आर्थिक व्यवहार, सेवांना फटका बसतो
  2. पॅनकार्ड नसेल तर सरकारी, सहकारी आणि खासगी बँकेत खाते उघडता येते
  3. क्रेडिट आणि डेबिट कार्ड मिळणार नाही
  4. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडता येणार नाही
  5. परदेश यात्रेदरम्यान पॅनकार्डचा तपशील नसेल तर फटका
  6. एकाचवेळी 50 हजारांहून अधिकची रक्कम जमा करता येणार नाही
  7. म्युच्युअल फंडात एकाचवेळी 50 हजार रुपयांपेक्षा अधिकचे पेमेंट
  8. कोणत्याही संस्थेला 50 हजार रुपयांची रक्कम पाठविता येणार नाही
  9. आरबीआयकडून बाँड खरेदीसाठी एकदाच 50 हजारांहून अधिकची रक्कम खर्च करता येणार नाही
  10. कोणत्याही बँकेत, मुदत ठेव वा इतर योजनेतील वार्षिक गुंतवणूक 5 लाख रुपयांपेक्षा अधिक नको
  11. बँक ड्रॉफ्ट, पे ऑर्डर, धनादेशासाठी 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही
  12. एका आर्थिक वर्षात विम्याचा हप्ता 50 हजार रुपयांपेक्षा जास्त भरता येणार नाही
  13. शेअर बाजारात एक लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करता येणार नाही
  14. निष्क्रिय पॅन वापरल्यास कर कपातीचा फटका
  15. दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी-विक्री करता येणार नाही.
  16. 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची चल-अचल संपत्तीची खरेदी विक्री करता येणार नाही
  17. दोन लाख रुपयांपेक्षा अधिकच्या वस्तूची खरेदी विक्री केल्यास कर भरावा लागेल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.