AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?

Salary increase | काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?
Insolvency and Bankruptcy Code IBC
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 25, 2021 | 7:21 AM
Share

मुंबई: कोरोना संकटामुळे वेग मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही काळात नव्याने उभारी घेण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गिफ्ट मिळू शकते. गेल्यावर्षीपासून कोरोना संकटामुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ लांबणीवर टाकली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदरी सातत्याने निराशाच पडत आहे.

मात्र, ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. देशातील ई-कॉमर्स, आयटी, फार्मा आणि आर्थिक सेवांशी संबंधित कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आगामी काळात चांगली पगारवाढ मिळू शकते. हॉटेल आणि हवाई सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र चांगल्या पगारवाढीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारताने कोरोनाची तिसरी लाटही यशस्वीपणे परतवून लावली तर एप्रिल 2022 पासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल. बहुतांश कंपन्यांमध्ये कमीतकमी 8 टक्के पगारवाढ होईल. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोणत्या कंपन्यांमध्ये चांगली पगारवाढ झाली?

कोरोनाकाळात देशातील प्रमुख कंपन्यांनी प्रमोशन आणि पगारवाढ रोखून धरली होती. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल. एक्सेंचर इंडिया (Accenture India), टीसीएस (TCS), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि इन्फोसिस (Infosys) या कंपन्यांनी कोरोना काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ दिली आहे.

संबंधित बातम्या:

अबब! एका वर्षात 600 टक्के रिटर्न्स; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली