AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?

Salary increase | काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?
Insolvency and Bankruptcy Code IBC
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 7:21 AM
Share

मुंबई: कोरोना संकटामुळे वेग मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही काळात नव्याने उभारी घेण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गिफ्ट मिळू शकते. गेल्यावर्षीपासून कोरोना संकटामुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ लांबणीवर टाकली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदरी सातत्याने निराशाच पडत आहे.

मात्र, ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. देशातील ई-कॉमर्स, आयटी, फार्मा आणि आर्थिक सेवांशी संबंधित कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आगामी काळात चांगली पगारवाढ मिळू शकते. हॉटेल आणि हवाई सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र चांगल्या पगारवाढीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारताने कोरोनाची तिसरी लाटही यशस्वीपणे परतवून लावली तर एप्रिल 2022 पासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल. बहुतांश कंपन्यांमध्ये कमीतकमी 8 टक्के पगारवाढ होईल. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोणत्या कंपन्यांमध्ये चांगली पगारवाढ झाली?

कोरोनाकाळात देशातील प्रमुख कंपन्यांनी प्रमोशन आणि पगारवाढ रोखून धरली होती. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल. एक्सेंचर इंडिया (Accenture India), टीसीएस (TCS), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि इन्फोसिस (Infosys) या कंपन्यांनी कोरोना काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ दिली आहे.

संबंधित बातम्या:

अबब! एका वर्षात 600 टक्के रिटर्न्स; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.