AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?

Salary increase | काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?
Insolvency and Bankruptcy Code IBC
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 25, 2021 | 7:21 AM
Share

मुंबई: कोरोना संकटामुळे वेग मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही काळात नव्याने उभारी घेण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गिफ्ट मिळू शकते. गेल्यावर्षीपासून कोरोना संकटामुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ लांबणीवर टाकली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदरी सातत्याने निराशाच पडत आहे.

मात्र, ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. देशातील ई-कॉमर्स, आयटी, फार्मा आणि आर्थिक सेवांशी संबंधित कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आगामी काळात चांगली पगारवाढ मिळू शकते. हॉटेल आणि हवाई सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र चांगल्या पगारवाढीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारताने कोरोनाची तिसरी लाटही यशस्वीपणे परतवून लावली तर एप्रिल 2022 पासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल. बहुतांश कंपन्यांमध्ये कमीतकमी 8 टक्के पगारवाढ होईल. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोणत्या कंपन्यांमध्ये चांगली पगारवाढ झाली?

कोरोनाकाळात देशातील प्रमुख कंपन्यांनी प्रमोशन आणि पगारवाढ रोखून धरली होती. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल. एक्सेंचर इंडिया (Accenture India), टीसीएस (TCS), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि इन्फोसिस (Infosys) या कंपन्यांनी कोरोना काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ दिली आहे.

संबंधित बातम्या:

अबब! एका वर्षात 600 टक्के रिटर्न्स; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

Follow Us
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
Ashok Gehlot | काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी; अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट!
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...