AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?

Salary increase | काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?
Insolvency and Bankruptcy Code IBC
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 7:21 AM
Share

मुंबई: कोरोना संकटामुळे वेग मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही काळात नव्याने उभारी घेण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गिफ्ट मिळू शकते. गेल्यावर्षीपासून कोरोना संकटामुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ लांबणीवर टाकली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदरी सातत्याने निराशाच पडत आहे.

मात्र, ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. देशातील ई-कॉमर्स, आयटी, फार्मा आणि आर्थिक सेवांशी संबंधित कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आगामी काळात चांगली पगारवाढ मिळू शकते. हॉटेल आणि हवाई सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र चांगल्या पगारवाढीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारताने कोरोनाची तिसरी लाटही यशस्वीपणे परतवून लावली तर एप्रिल 2022 पासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल. बहुतांश कंपन्यांमध्ये कमीतकमी 8 टक्के पगारवाढ होईल. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोणत्या कंपन्यांमध्ये चांगली पगारवाढ झाली?

कोरोनाकाळात देशातील प्रमुख कंपन्यांनी प्रमोशन आणि पगारवाढ रोखून धरली होती. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल. एक्सेंचर इंडिया (Accenture India), टीसीएस (TCS), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि इन्फोसिस (Infosys) या कंपन्यांनी कोरोना काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ दिली आहे.

संबंधित बातम्या:

अबब! एका वर्षात 600 टक्के रिटर्न्स; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.