AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

जर लवकर परतफेड केली तर दुप्पट फायदा होतो. कमी अवधीत वेळीच कर्ज पैसे फेडून तुम्ही उर्वरित पैसे इतरत्र गुंतवून चांगले उत्पन्न मिळवू शकता. (How to repay a 20 year loan in 10 years, know simple tips to save money from Smart Savings)

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या 'स्मार्ट सेव्हिंग्स'मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती
एसबीआयची कोट्यवधी ग्राहकांना भेट, कर्ज केले स्वस्त
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 7:39 AM
Share

नवी दिल्ली : आपले 20 वर्षांचे कर्ज जर 10 वर्षांतच परत केले तर किती बरे होईल? मग उरलेले पैसे कुठेतरी गुंतवा आणि चांगले पैसे मिळवा. हे शक्य आहे. याला ‘स्मार्ट सेव्हिंग’ म्हणतात. ईएमआय वाढवून परतफेड कशी करावी हे फक्त माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरुन कर्जाचा कालावधी निम्म्याने कमी होईल. कर्ज दीर्घकाळ ठेवणे फायद्याचे नसते, यामुळे व्याजाचा त्रास वाढतो. जर लवकर परतफेड केली तर दुप्पट फायदा होतो. कमी अवधीत वेळीच कर्ज पैसे फेडून तुम्ही उर्वरित पैसे इतरत्र गुंतवून चांगले उत्पन्न मिळवू शकता. (How to repay a 20 year loan in 10 years, know simple tips to save money from Smart Savings)

असे बरेच लोक आहेत जे गृह कर्ज घेऊन घर खरेदी करतात. काही वर्षांपूर्वी घेतलेले कर्ज त्यावेळच्या वेगळ्या व्याजदरासह घेतलेले असते, पण आता व्याज वाढलेले असते. मग आपल्याला कर्जाचे व्याज किती भरावे लागेल हे एकदा आपल्याला योग्यरित्या समजले पाहिजे. आपल्याला हे लक्षात येईल कि आपण दीर्घ मुदतीमुळे मूळ रकमेपेक्षा अधिक व्याज भरणार आहोत. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कर्जाची रक्कम लवकरात लवकर परतफेड करणे.

कर्जाचा कालावधी कमी ठेवा

आपण प्री-पेमेंटमध्ये कर्जाची रक्कम परत केल्यास, व्याजदर खाली येईल. 20 वर्षांचे कर्ज 10 वर्षात पूर्ण केले जाऊ शकते. कर्ज घेताना लोक बर्‍याचदा ईएमआय कमी व्हावा म्हणून अधिकची मुदत ठेवतात. जेणेकरून कमी पैसे द्यावे लागतील असा समज असतो. परंतु आपल्याला अशा परिस्थितीत अधिक व्याज द्यावे लागेल. म्हणूनच आर्थिक सल्लागार आपल्याला कमी कालावधीसाठी कर्ज घेण्याची शिफारस करतात.

कर्जाची मुदत कमी कशी करावी?

कर्जाच्या प्री-पेमेंटबाबत आर्थिक नियोजकांचे म्हणणे आहे की जर उत्पन्न वाढत असेल तर दरमहा EMI चे प्रमाण काही ना काही वाढवले ​​जावे. जर तुम्ही 20 वर्षांच्या कर्जावर प्रत्येक ईएमआयवर 5% वाढ केली तर कर्जाचा कालावधी 8 वर्षांपर्यंत कमी करता येईल. जर ईएमआय 10% ने वाढविला असेल तर 20 वर्षांचे कर्ज 10 वर्षात संपेल. कर्जदाराकडे कर्जावरील व्याज कमी करण्यासाठी दोन पर्याय आहेत. एकतर एकरकमी 5-10 लाख रुपये जमा करू शकता किंवा 5 वर्षानंतर ईएमआयची रक्कम वाढवू शकता.

50 लाखांच्या कर्जावर किती व्याज?

जर कर्जदाराने 5 वर्षानंतर 10 लाख रुपयांच्या प्रीपेमेंटची परतफेड केली तर त्याला व्याजावर मोठा दिलासा मिळतो. समजा एखाद्या व्यक्तीने 20 वर्षांपासून 50 लाख रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. या कर्जासाठी 7% व्याज दराने 38,765 रुपयांचा ईएमआय बसतो. 5 वर्षांनंतर 10 लाख रुपयांची परतफेड केल्यास कर्जाची मुदत 5 वर्षांपर्यंत कमी होईल. पूर्वीचे मूळ व्याज 26.65 लाख रुपयांसाठीचे होते, ते आता 12.87 लाखांवर जाईल. यातून 13.78 लाख रुपयांची बचत होईल. जर तुम्ही त्याच 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली (जी तुम्ही प्री-पेमेंट म्हणून दिली आहे), तर 10 वर्षानंतर तुम्हाला 8% व्याजावर 21.59 लाख रुपये मिळतील. जर व्याज 12 टक्के असेल तर ही रक्कम 25.94 लाख आहे आणि जर व्याज 12 टक्के असेल तर 31.06 लाख उपलब्ध असतील.

आपण किती व्याज वाचवू शकता?

तुम्ही 50 लाखांच्या गृह कर्जावर 5 वर्षानंतर प्रत्येक ईएमआयची रक्कम 20,000 रुपयांनी वाढवू शकता. जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवले असतील आणि त्यामधून चांगले उत्पन्न मिळत असेल तर ईएमआय वाढवून तुम्ही त्या पैशांचा व्याज कमी करण्यासाठी वापरु शकता. जर ईएमआयमध्ये 20,000 रुपयांची वाढ झाली तर कर्जाचा परतफेड कालावधी 7 वर्षांनी कमी होईल. जर ईएमआय वाढविला नाही तर वास्तविक व्याज 26.65 लाख रुपयांवर 7% दराने असेल. जर ईएमआयमध्ये 20 हजार रुपयांची वाढ केली तर नवीन व्याज 13.32 लाख रुपये होईल. अशा प्रकारे आपण 13.33 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. (How to repay a 20 year loan in 10 years, know simple tips to save money from Smart Savings)

इतर बातम्या

Ambil Odha : बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे जाणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

बुलडाण्यात ढगफुटीसदृश पाऊस, नदी-नाल्यांना पूर, धरणाच्या भिंतीवरून पाणी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.