AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Gold Bond : स्वस्त सोने खरेदीची शेवटची संधी, केंद्र सरकार इतक्या स्वस्तात करत आहे विक्री

Government Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची ग्राहकांना आज शेवटची संधी आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत फिजिकल गोल्डपेक्षा अधिक फायदा मिळतो. तेव्हा ही संधी सोडू नका. मोठा मिळेल फायदा..

Government Gold Bond : स्वस्त सोने खरेदीची शेवटची संधी, केंद्र सरकार इतक्या स्वस्तात करत आहे विक्री
| Updated on: Jun 23, 2023 | 3:14 PM
Share

नवी दिल्ली : बाजारात स्वस्तात सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. सॉव्हेरिन गोल्ड बाँड स्कीममधील (Sovereign Gold Bond 2023-24) पहिल्या मालिका संपत आली आहे. पहिल्या दिवशी सोनं खरेदी करता आले नाही तर आज शेवटच्या दिवशी ही संधी दवडू नका. 19 जूनपासून सरकारच्या गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीला सुरुवात झाली आहे. आज 23 जून रोजी ही मालिका बंद होत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत 5,926 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने सोने खरेदी करता येईल. गेल्या सात वर्षांपासून ही योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून अनेक नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. त्यांना जोरदार परतावा मिळाला आहे.

दुसरा टप्पा केव्हा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणण्यात आली. आता दुसरी मालिका 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान आणण्यात येईल. तोपर्यंत सोन्याच्या भावात काय बदल होतो, हे स्पष्ट होईल. आज सोन्यात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे.

50 रुपयांची सवलत या गोल्ड बाँडमध्ये डिजिटल माध्यमातून पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रत्येक ग्रॅमवर 50 रुपयांची सूट मिळेल. 5,926 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने सोने खरेदी करता येईल. ऑनलाईन खरेदीवर 50 रुपये सवलतीमुळे प्रति ग्रॅम 5,876 रुपये असा भाव असेल. या योजनेत ग्राहकांना 2.5 रुपयांचे वार्षिक व्याज मिळेल. व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी जमा होईल.

2015 मध्ये या योजनेची सुरुवात 2014 साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. त्यावेळी गोल्ड बाँड आणण्याचे निश्चित करण्यात आले होते. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना बाजारात उतरवली. दरवर्षी गुंतवणुकीची सुवर्णसंधी मिळते. गोल्ड बाँडचा कालावधी आठ वर्षांसाठी आहे. 2017-18 मधील सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची ही तिसरी मालिका आहे. या मालिकेतून मुदतपूर्व रक्कम काढण्यासाठी 15 एप्रिल, 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

कोणाला खरेदी करता येईल बाँड सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍यांना 50 रुपयांची सवलत देण्यात येईल.

इतका परतावा या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते.

Follow Us
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?