AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Safety : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला, पण चारचाकीचं बजेट बिघडणार बघा..एका निर्णयाचे असेही इफ्केट..

Safety : कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे..

Safety : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला, पण चारचाकीचं बजेट बिघडणार बघा..एका निर्णयाचे असेही इफ्केट..
प्रवाशांची सुरक्षा महत्वाची Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 29, 2022 | 5:30 PM
Share

नवी दिल्ली : कारमधील (Four-Wheeler) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी (Safety) केंद्र सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आता कारमध्ये 6 एअरबॅग (Airbags) सक्तीची घोषणा केली. या निर्णयामुळे रस्ते अपघातात किड्या-मुंगीसारखे माणसं मरणार नाहीत, हे नक्की.

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा नुकताच मुंबईच्या जवळ रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने कारमध्ये 6 एअरबॅगची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून ही सक्ती लागू करण्यात येणार होती. पण नंतर सरकारने यावर घुमजाव केले.

प्रत्येक कारमध्ये आता वाहन उत्पादक कंपन्यांना 6 एअरबॅग लावाव्या लागतील. अर्थात पुढील वर्षी 1 ऑक्टोबरपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. कंपन्यांना यासाठी आणखी एक वर्षाची केंद्र सरकारने वेळ वाढून दिली आहे. त्यामुळे कार उत्पादक कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. पण या निर्णयामुळे बजेटमधील कार आता महाग होण्याची दाट शक्यता आहे. कार उत्पादक कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे.

या निर्णयामुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढणार असल्याने कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. तर केंद्र सरकार एअरबॅग सुविधा देण्यावर ठाम होते. सध्या देशात दोन एअरबॅगची सक्ती आहे. त्यात आता आणखी चार एअरबॅगची भर पडणार आहे. कारची किंमत 50 ते 60 हजार रुपयांनी वाढणार असल्याचे कंपन्यांचा दावा आहे.

कारमध्ये 6 एअरबॅग असत्या तर 2020 मध्ये 13,000 हून अधिक लोकांचे प्राण वाचले असते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. या एका निर्णयामुळे प्रवाशांचे, वाहनधारकांचे प्राण वाचणार आहे. नियम न पाळणाऱ्या कार उत्पादक कंपन्या वठणीवर येणार आहेत.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार