तमालपत्राची शेती सुरु करा, काही वर्षांमध्ये व्हाल मालामाल, जाणून घ्या सर्वकाही

अशाच एक पिकांपैकी एक म्हणजे तमालपत्र. आहारात सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या तमालपत्राची शेती खूप फायदेशीर ठरु शकते. तमालपत्राला इंग्रजीत बे लीफ असे म्हटले जाते.

तमालपत्राची शेती सुरु करा, काही वर्षांमध्ये व्हाल मालामाल, जाणून घ्या सर्वकाही
तमालपत्राची शेती
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 9:27 AM

नवी दिल्ली: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रत्यक्ष शेती किंवा शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.

अशाच एक पिकांपैकी एक म्हणजे तमालपत्र. आहारात सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या तमालपत्राची शेती खूप फायदेशीर ठरु शकते. तमालपत्राला इंग्रजीत बे लीफ असे म्हटले जाते.

अन्नपदार्थ चवदार करण्यासाठी मसाले म्हणून तमालपत्राचा वापर केला जातो. अनेक वर्षांपासून त्याची निर्मिती केली जात आहे. भारत, रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स आणि उत्तर अमेरिका आणि बेल्जियममध्ये तमालपत्राचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

तमालपत्राची शेती कशी सुरु कराल?

आपण तमालपत्राची लागवड सहजपणे सुरू करू शकता. ही शेती करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात थोडी मेहनत करावी लागेल. जसजसे झाडे वाढतात तसतसे तुमच्या उत्पन्नात वाढ होत जाईल. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून तमालपत्राची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते.

किती उत्पन्न मिळणार?

नफ्याबद्दल बोलायचे झाले तर एका तमालपत्राच्या रोपातून तुम्ही वर्षाला 5 हजार रुपये कमवू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही वर्षाला 25 तमालपत्राची झाडे लावली तर तुम्हाला 75 हजार ते 1 लाख 25 हजार वार्षिक उत्पन्न मिळू शकते.

ग्रामीण भागातील तरुणांची चंदनाच्या शेतीला पसंती

गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागामध्ये चंदनाच्या शेतीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. चंदनाच्या लागवडीतून भरपूर नफा होतो. याच कारणामुळे आजकाल तरुणांचा नोकरीपेक्षा याकडे जास्त कल आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील एका उत्कृष्ट पांडे या तरुणाने अधिकाऱ्याची नोकरी सोडून गावात चंदनाची शेती सुरु केली. यामधून त्याला बक्कळ फायदा मिळाला. त्यामुळे ग्रामीण भागात नोकरी करण्याऐवजी चंदनाची शेती हा उत्पन्नाचा चांगला मार्ग ठरू शकतो.

चंदनाच्या शेतीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळण्यास दीर्घ काळ लागतो. मात्र, यामधून मिळणारा फायदाही घसघशीत असतो. भारतात चंदनाची किंमत सुमारे 8-10 हजार रुपये प्रति किलो आहे, तर परदेशात त्याची किंमत 20-25 हजार रुपये आहे. एका झाडामध्ये सुमारे 8-10 किलो लाकूड सहज उपलब्ध होते. दुसरीकडे, जर आपण जमिनीबद्दल बोललो, तर एका एकरातील चंदनाच्या झाडापासून 50 ते 60 लाख मिळू शकतात.

संबंधित बातम्या:

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

नोकरी शोधण्यापेक्षा 70 हजारात ‘हा’ व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय, 80 टक्क्यांपर्यंत कर्ज, 6 लाखांचा निव्वळ नफा

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.