AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेत हजारांची बचत, 10 वर्षांतच दामदुप्पट..

Scheme | पोस्ट खात्यातील योजनेत हजार रुपयांची बचत तुम्हाला दहा वर्षांतच मालामाल करु शकते. योजनेतील गुंतवणूकही सुरक्षित समजण्यात येते.

Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेत हजारांची बचत, 10 वर्षांतच दामदुप्पट..
या खात्यात रक्कम दामदुप्पटImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 24, 2022 | 5:28 PM
Share

नवी दिल्ली : पोस्ट खात्याच्या (Post Office) अल्पबचत योजना (Small Saving Scheme) लोकप्रिय आहेत. या योजनेतील गुंतवणुकीची केंद्र सरकार हमी घेते. बँक बुडाली तर केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच मदत मिळते. पण पोस्टातील गुंतवणूक (Investment) जोखमीच्या बाहेर आहे. पोस्ट खात्यातील योजनेत हजार रुपयांची बचत तुम्हाला दहा वर्षांतच मालामाल करु शकते. त्याविषयी जाणून घेऊयात..

पोस्टातील गुंतवणूक अल्पबचत योजनेत मोडते. त्यामुळे गुंतवणुकीची सवय लागते. तसेच भविष्य काळात ही गुंतवणूक विशिष्ट उद्देशांसाठी वापरता येते. विशेष म्हणजे व्याजदर जोरदार असल्याने या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

पोस्ट कार्यालयामार्फत गुंतवणुकीसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यामध्ये मुदत ठेव योजना, आवर्ती ठेव योजना, मासिक बचत योजना, जेष्ट नागरिक बचत योजना, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश होतो.

या सर्व योजना लोकप्रिय असल्याने भारतीय लोक या योजनेत गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीवर प्राप्तीकर कायद्यातंर्गत सवलतही मिळते. त्यामुळे गुंतवणूक होते. चांगला परतावा मिळतो. तसेच कर बचत ही करता येते.

तर टपाल खात्याच्या किसान विकास पत्र योजनेतील (KVP) गुंतवणुकीतून तुम्हाला 10 वर्ष 4 महिन्यात रक्कम दामदुप्पट मिळते. या योजनेत गुंतवणुकीवर वार्षिक 6.9 टक्के व्याज मिळते. त्यामुळे अवघ्या 124 महिन्यात ही रक्कम दुप्पट होते.

या योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करु शकते. केव्हीपीमध्ये गुंतवणुकदाराला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

केव्हीपी योजनेत एक, अथवा तीन व्यक्तींना मिळून संयुक्त खाते उघडता येते. अल्पवयीन अथवा भोळसर व्यक्तीला ही खाते उघडता येते. त्यासाठी पालकाची आवश्यकता आहे. खाते हस्तांतरणाचाही पर्याय गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचा वारस अथवा सहखातेदाराच्या नावे खाते हस्तांतरीत होते.

काही अटी व शर्तींवर हे खाते केव्हाही बंद करता येते. खातेदाराचा अथवा संयुक्त खात्यातील भागीदारांचा मृत्यू ओढावल्यास खाते बंद करता येते.

तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....