AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅन, आधारशी संबंधित आजपासून ‘हा’ मोठा नियम लागू; कॅश ट्रान्सॅक्शन करण्याआधी वाचा बातमी

20 लाख रुपयांच्या व्यवहारांना आजपासून आधारकार्डचे बंधन (Aadhaar card) अनिवार्य करण्यात आले आहे. 20 लाख रुपये जमा करायचे असतील अथवा काढायचे असतील तर व्यवहार करताना आधार कार्ड क्रमांक नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. 26 मे पासून हा नियम लागू करण्यात आला आहे.

पॅन, आधारशी संबंधित आजपासून 'हा' मोठा नियम लागू; कॅश ट्रान्सॅक्शन करण्याआधी वाचा बातमी
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 10:15 AM
Share

या काही दिवसांत मोठा व्यवहार करण्यापूर्वी ही अट समजून घ्या. आधार कार्डसंबंधित (Aadhaar Card) एक मोठा नियम 26 मेपासून लागू करण्यात आला आहे. हा नियम अर्थात बँकेतील व्यवहारासंबंधी (Cash Transaction) आहे. एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांहून अधिकच्या रोखीचा व्यवहार करत असाल तर तुम्हाला आधार कार्ड अथवा पॅन कार्डची माहिती देणे अनिवार्य आहे. जर तुम्ही हा नियम वा-यावर सोडला तर प्राप्तिकर खात्याची तुम्हाला घरपोच नोटीस येईल आणि तुमच्या अडचणीत वाढ होईल. रोखीतील व्यवहारात 20 लाख रुपये खात्यातून काढत असाल तर आधार कार्ड अथवा पॅन कार्ड क्रमांकाची नोंद करणे अनिवार्या करण्यात आले आहे. यापूर्वी हा नियम लागू नव्हता. आजापासून म्हणजे 26 मे पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 20 लाखांच्या व्यवहाराची मर्यादा एका आर्थिक वर्षांकरिता (Fiscal Year) लागू आहे.

केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क मंडळाने (CBDT) 10 मे रोजी याविषयीची एक अधिसूचना दिली. रोख रक्कम काढणे अथवा रोखीत रक्कम जमा करणे या व्यवहारांना हा नियम लागू आहे. याची मर्यादा 20 लाख अथवा त्यावरील ज्यादा रक्कम अशी असेल. एक अथवा त्यापेक्षा अधिकच्या बँक खात्यात 20 लाख अथवा त्यापेक्षा अधिकची रक्कम जमा करणे अथवा काढल्यास या नियमाअंतर्गत तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड क्रमांकाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की, बँक राष्ट्रीय असो, सहकारी असो, खासगी असो वा टपाल खात्यातील बचत खाते असो, हा नियम सगळीकडे लागू आहे. या सर्व खात्यात मिळून एकत्रित एका वर्षात 20 लाख अथवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार झाला तर तुम्हाला आधार कार्ड अथवा पॅनकार्डची नोंद करणे अनिवार्य आहे.

काय आहे नियम?

बचत खात्याऐवजी जर एखाद्या व्यक्तीकडे चालू खाते (current account) अथवा रोख क्रेडिट खाते(CC) असो, या खात्यांनाही 20 लाख रोखीचा नियम लागू असेल. नवीन खाते उघडणारे सुद्धा या नियमांपासून सूटलेले नाहीत. बँक राष्ट्रीय असो, सहकारी असो, खासगी असो वा टपाल खात्यातील बचत खाते असो, हा नियम सगळीकडे लागू आहे. या सर्व खात्यात मिळून एकत्रित एका वर्षात 20 लाख अथवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार झाला तर तुम्हाला आधार कार्ड अथवा पॅनकार्डची नोंद करणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर असा व्यवहार करण्यापूर्वी त्यासाठी किमान 7 दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.

Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप