AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Reservation | 5 ते 12 वयातील मुलांसाठी रेल्वेचा बर्थ बुक करण्याचा नियम काय ? किती असते भाडे ?

मुलांसोबत रेल्वेचा प्रवास करताना तिकीट पूर्ण काढावे लागते की अर्धे याबाबत अजूनही पुरेसे ज्ञान सर्वसामान्यांना नसते पाहूया याबाबत नेमके नियम काय आहेत ?

Railway Reservation | 5 ते 12 वयातील मुलांसाठी रेल्वेचा बर्थ बुक करण्याचा नियम काय ? किती असते भाडे ?
INDIAN RAILWAYImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 22, 2023 | 3:34 PM
Share

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : भारतीय रेल्वेने मुलांसाठी तिकीटांच्या दराचा नियमात बदल करुन गेल्या सात वर्षांत तब्बल 2800 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई केली आहे. एका आरटीआय कार्यकर्त्याने केलेल्या माहितीच्या अर्जाला रेल्वेची आयटी कंपनी ‘क्रिस’कडून दिलेल्या उत्तरातून ही बाब उघडकीस आली आहे. लहान मुलांच्या प्रवास भाड्याच्या सुधारित नियमांमुळे एकट्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 560 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे हे वर्षे सर्वाधिक नफ्याचे वर्ष ठरले आहे. रेल्वेची ‘क्रिस’ कंपनी प्रवासी आणि मालवाहतूक, रेल्वे दळणवळण नियंत्रण सारख्या मुख्य सेवांमध्ये माहिती तंत्रज्ञान विषयक तंत्रज्ञान पुरविते.

रेल्वे पाच ते बारा वयोगटातील मुलांचे संपूर्ण तिकीट भाडे वसुल करणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने 31 मार्च 2016 रोजी केली होती. जर या वयोगटातील मुलांना स्वतंत्र बर्थ सीट हवी आहे तर त्यांना संपूर्ण भाडे द्यावे लागणार आहे. हा सुधारित नियम 21 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आला होता. याआधी रेल्वे 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी अर्धे भाडे आकारुन त्यांनी बर्थ उपलब्ध करीत होता. जर मुलांनी स्वतंत्र बर्थ न घेता आपल्या सहकारी वयस्काच्या बर्थवरच प्रवास करायचा असेल तर त्यांच्यासाठी अर्धे तिकीट आकारले जात होते.

मुलांसाठी काय आहे नियम

रेल्वे प्रवासात 1 ते 4 वयोगटातील मुलांसाठी रिझर्व्ह बोगीतून रिझर्व्हेशन करीत प्रवास करण्याची काही गरज नाही. पाच वर्षांखालील मुले विनातिकीट ट्रेनचा प्रवास करु शकतात. तर 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी मात्र स्वतंत्र आरक्षित सीट नको असेल तर अर्धे भाडे भरुन आपल्या आई-वडीलांसोबत किंवा नातेवाईकांच्या सीटवरुन प्रवास करु शकतात. परंतू 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी जर स्वतंत्र बर्थ हवी असेल तर त्यांना संपूर्ण भाडे भरावे लागेल. जर प्रवास करताना तुम्ही 1 ते 4 वयोगटातील मुलाचे डीटेल्स भरले तर त्याचे भाडे द्यावे लागेल. जर डीटेल्स नाही भरले तर 1 ते 4 वयातील मुले मोफत प्रवास करु शकतात.

आता मुलांसाठी पूर्ण बर्थ आरक्षित केली जाते

क्रिसने मुलांची दोन श्रेणीचे भाड्यांचा पर्यायाआधारे साल 2016-17 ते 2022-23 पर्यंतचे कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. या सात वर्षांत 3.6 कोटीहून अधिक मुलांनी रिझर्व्ह सीट वा बर्थचा पर्याय न निवडता अर्धे भाडे भरुन प्रवास केला. दुसरीकडे 10 कोटीहून अधिक मुलांनी स्वतंत्र बर्थ वा सीटचा पर्याय निवडून पूर्ण भाडे भरले. आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांच्या मते रेल्वेने प्रवास करणाऱ्या एकूण मुलांपैकी 70 टक्के मुलांनी पूर्ण भाडे भरुन बर्थ वा सीटचे आरक्षण करणे पसंत केले आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.