AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोल्ड लोनच्या परतफेडीसाठी एफडीवर कर्ज घ्यावे का?, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

तुम्ही जर पूर्वी गोल्ड लोन घेतले असेल आणि ते भरण्यासाठी तुम्ही तुमच्या एफडीवर कर्ज काढणार असाल तर काय काळजी घ्यावी? तसेच असे लोन घेणे योग्य असते का? आज आपण जाणून घेणार आहोत.

गोल्ड लोनच्या परतफेडीसाठी एफडीवर कर्ज घ्यावे का?, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 6:15 AM
Share

नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात एखाद्यावेळेस असा प्रसंग येतो की, जेव्हा आपल्याला अचानक कर्जाची गरज लागते. कर्ज घेण्याचे अनेक प्रकार असतात, त्यातील प्रमुख प्रकार म्हणजे आपण आपल्याकडे असलेले सोने तारण ठेऊन कर्ज घेतो किंवा आपली जर बँकेत एखादी एफडी असेल तर तिच्यावर कर्ज  घेतो. आपल्याला या पद्धतीने सहज लोन मिळते. मात्र असे लोन घेणे योग्य आहे का? त्याचे फायदे तोटे काय आहेत. तसेच तुम्ही जर पूर्वी गोल्ड लोन घेतले असेल आणि ते भरण्यासाठी तुम्ही जर तुमच्या एफडीवर लोन काढणार असाल तर काय काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत.

व्याजदराचा विचारा करा

जेव्हा आपल्याकडे एखाद्या बँकेचे गोल्ड लोन असते आणि आपण ते फेडण्यासाठी एफडीवर लोन घेण्याचा विचार करतो, तेव्हा सर्वप्रथम व्याजदर लक्षात घेणे आवश्यक असते. म्हणजेच काय जर बँक तुमच्याकडून गोल्ड लोनवर दहा टक्के दराने कर्ज  वसूल करत आहे. मात्र दुसरीकडे तुम्हाला जर एफडीवर पाच ते सहा टक्के व्याज दराने कर्ज मिळाल्यास तुमचा फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एफडीवर कर्ज काढून गोल्ड लोनचे पैसे भरू शकतात. त्यामध्ये तुमचा चार ते पाच टक्क्यांचा फायदा होऊ शकतो. मात्र काही बँका अनेकदा कमी व्याजदराने देखील गोल्ड लोन देतात. अशावेळेस एफडीवर मिळणाऱ्या लोनवर जर जादा कर्ज आकारले जात असेल, तर लोन घेणे टाळावे. असे लोन घेतल्यास आपले नुकसान होऊ शकते.

गोल्ड लोन घेणे कितपत योग्य? 

आता पाहुयात की सोने किंवा एफडीवर लोन काढणे कितपत योग्य आहे. याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात. तज्ज्ञांच्या मते तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक केली असेल किंवा एफडीच्या रुपामध्ये बँकेत काही विशिष्ट रक्कम ठेवली असेल तर ही गुंतवणूक कधीही तुमच्या फायद्याची ठरते. कारण तुम्हाला हवे तेव्हा या दोन आधारावर कर्ज  मिळू शकते. मात्र अगदी गरज असेल तेव्हाच या मार्गाचा अवलंब करणे  योग्य ठरते. आणखी एक महत्त्वाचे म्हणेज सोन्याचे दर हे सातत्याने कमी जास्त होत असतात. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करताना किंवा गोल्ड लोन घेताना सर्व व्यवहार हे काळजीपूर्वकच करावेत, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञाकडून दिला जातो.

संबंधित बातम्या 

Road Ministry New Navigation App : अपघाताचा धोका होणार कमी! रस्ते मंत्रालयानं लाँच केलं नेव्हिगेशन अॅप

हा तिरपेपणा ‘डोळस’ आहे, भारतीय नोटांवर का असतात तिरप्या रेषा; काय आहे त्याचा अर्थ? 

चालू आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात तेजी, काय आहेत आजचे दर?

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात