AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway : पडला का बुचकाळ्यात! उशीरा रात्री स्टेशनवर उतरुन थांबल्यास, घ्यावे लागते का प्लॅटफॉर्म तिकीट

Railway : रात्री उशीरा रेल्वे स्टेशनवर उतरावे लागले आणि सकाळपर्यंत थांबायचे असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते का? काय आहे नियम..

Railway : पडला का बुचकाळ्यात! उशीरा रात्री स्टेशनवर उतरुन थांबल्यास, घ्यावे लागते का प्लॅटफॉर्म तिकीट
| Updated on: Apr 09, 2023 | 7:26 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही रेल्वेतून प्रवास (Railway Journey) करत नसाल. मित्राला, नातेवाईकांना सोडायला रेल्वे स्थानकावर आले असाल, तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते. रेल्वे बोर्डानुसार, प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करणे अनिवार्य आहे. विना प्लॅटफॉर्म तिकीट तुम्हाला दंड होऊ शकतो. त्यासाठी दंड द्यावा लागतो. पण एखादा प्रवासी मध्यरात्री रेल्वे स्टेशनवर उतरत असेल आणि त्याला घरी जाण्यासाठी त्यावेळी दुसरे साधन नसेल आणि तो सकाळपर्यंत रेल्वे स्थानकात थांबणार असेल तर त्याला प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) खरेदी करावे लागते का?

कारण काय प्रत्येक दिवशी लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यांना त्यांच्या गंतव्य, इच्छित स्थानकावर उतरायचे असते. पण अनेकवेळा वाहतूक साधनांची कमी, सुरक्षेची कारणे आणि थकव्यानंतर रात्रभर आरामाची सवय या कारणामुळे प्रवाशी सकाळीच रेल्वे स्थानक सोडण्याच्या मानसिकतेत असतात. त्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्म तिकीटाची आवश्यकता असते का असा प्रश्न अनेकांना पडतो.

प्रवास संपल्यानंतर स्टेशनवर थांबावे का भारतीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ते एका स्थानावरुन दुसऱ्या ठिकाणी जातात. काही प्रवासी दुरचा पल्ला तुटक तुटक गाठतात. एका स्टेशनवर उतरुन दुसऱ्या ठिकाणी त्यांना रेल्वेने जायचे असते. त्यासाठी त्यांना दुसऱ्या रेल्वेची वाट पाहत थांबावे लागते.

वेटिंग रुमची व्यवस्था प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने वेटिंग रुमची, प्रतिक्षालयांची व्यवस्था केली आहे. याठिकाणी प्रवाशांना काही वेळ थांबता येते. अनेकदा मध्यरात्री आलेले प्रवाशी सुरक्षेच्या कारणाने अथवा योग्य वाहतूक साधन नसल्याने रात्री वेटिंग रुममध्येच थांबण्याचा निर्णय घेतात. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा निर्णय योग्य ठरतो. या वेटिंग रुमचा त्यांना रात्री आधार असतो. या ठिकाणी रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त असतो.

प्लॅटफॉर्म तिकीट गरजेचे आहे का समजा एखादा प्रवासी मध्यरात्री रेल्वे स्टेशनवर उतरला आणि त्याला रात्रभर स्टेशनवर थांबून सकाळी जायचं असेल तर त्याला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते का, तर याचे उत्तर नाही असे आहे. अशा प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट घेण्याची गरज नाही. पण त्याच्याकडे त्याने केलेल्या प्रवासाचे तिकीट असणे आवश्यक आहे. गरज पडल्यास तिकीट तपासणीस अथवा इतर अधिकाऱ्यांना त्यांना हे तिकीट दाखविता येईल. प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर पुढील दोन तास वैध असते. प्लॅटफॉर्म तिकीटाचे शुल्क प्रत्येक रेल्वे स्टेशनवर वेगवेगळे असते.

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?